शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ३१ हजार ८३३ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:57 IST

सुधागड, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे प्रत्येकी एक

अलिबाग : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण ३१ हजार ८३३ विद्यार्थी आहेत. जिल्ह्यातील ४४ केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल.

सुधागड, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे प्रत्येकी एक, उरण, कर्जत, पेण, रोहा आणि महाड या पाच तालुक्यांत प्रत्येकी तीन, खालापूर आणि माणगाव येथे प्रत्येकी चार, अलिबाग सहा आणि पनवेल तालुक्यात नऊ अशा एकूण ४४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी या भरारी पथकांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. एकाच वर्गात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर शंभर मीटरच्या परिसरात पोलीस अधिनियम ३७(१) (३) प्रमाणे पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष असणार आहे. सोमवारी परीक्षा केंद्रांवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक शोधण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्चदरम्यान होत असून रायगड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण ४० हजार ९३ विद्यार्थी आहेत. ७१परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.आगरदांडा : मुरूड तालुक्यातील ६६७ विद्यार्थी मुरूड शहरातील सर एस. ए. हायस्कूल केंद्रावर परीक्षा देणार आहेत. नादगांव हायस्कूल, विहुर येथील मेहबूब, सर एस. ए. हायस्कूल व अंजुमन हायस्कूलचे विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता विशेष पथक नेमले आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल व कॉपी आणू नये, असे आवाहन केंद्रप्रमुख आर. एन. मोरे व उपकेंद्रप्रमुख बी. एस. मोरे यांनी के ले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड