शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामार्गाच्या कामासाठी धार नदीचा पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:13 IST

ग्रामस्थ संतप्त : वारे ग्रामपंचायतीच्या नोटिसीला केराची टोपली

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण ठेकेदार कंपनीकडून सुरू असून, या कामासाठी परिसरातील नदी नाल्यातून टँकरद्वारे पाणीउपसा सुरू केला होता. मात्र, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याकरिता स्थनिकांच्या मागणीनुसार कंपनीस पाणीउपसा थांबविण्यास सांगितले आहे. तरीही कंपनीने पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, ठोस कारवाईची मागणी होत आहे.

वारे ग्रामपंचायत हद्दीतील वारे कुरुंग मार्गावरील धार नदीच्या पात्रातून दोन-चार महिन्यांपासून महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी, नदीपात्रातील पाणीसाठा कमी होऊ लागला. या नदी परिसरातील आदिवासी बांधव या पाण्याच्या स्रोतावर अवलंबून आहेत. भाजीपाला लागवड करून आपली उपजीविका करत आहेत. त्याचप्रमाणे वन्यप्राणी, गुरांना उन्हाळ्यात याच पाण्याचा आधार आहे. मात्र, टँकरद्वारे होत असलेल्या बेसुमार पाणीउपशामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार हे निश्चित. याची दखल घेऊन वारे ग्रा.प. सरपंच योगेश राणे, उपसरपंच नीलेश म्हसे, पोलीसपाटील व ग्रामस्थांनी बैठक घेतली. या वेळी भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून हा पाणीउपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्या नोटिसीला केराची टोपली दाखवत ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता राजरोसपणे पाणीउपसा सुरू ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.रस्त्याच्या कामासाठी आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील नदीतून होणाºया पाणीउपशाने भविष्यात या पाण्यावर अवलंबून असणाºया आदिवासीवाड्यांना पाणीटंचाई जाणवू शकते. याचा विचार करता आम्ही ठेकेदार कंपनीस उपसा करण्यास रोखले आहे. मात्र, तरीही पाणीउपसा होत असेल तर ग्रामस्थांसह जागेवर जाऊन नदीपात्रात जाणारा रस्ता बंद करावा लागेल.

टँकरद्वारे बेसुमार पाण्याचा उपसाच्महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. यासाठी ठेकेदार कंपनीकडून महामार्ग परिसरातील नैसर्गिक नदी-नाल्यातून टँकरद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू आहे.च्त्यामुळे ज्या भागात पाण्यासाठी स्थानिक नदी-नाल्यांवर अवलंबून आहेत, तेथे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा विचार करून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग येथील धार नदीतील पाणीउपसा थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणी उपसा थांबविण्यास सांगितले होते.- योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायतकर्जत मुरबाड रस्त्याच्या कामासाठी होत असलेला पाणीउपसा लक्षात घेता भविष्यात या भागात पाणीटंचाई येणार आहे, याकरिता ग्रामस्थांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून या ठेकेदार कंपनीस नोटीस बजावून पाणीउपसा थांबवण्यास कळवले आहे. मात्र, नोटीस देऊनही पाणीउपसा सुरू असल्याचे समजते, त्यावर कारवाई केली जाईल.- नीलेश म्हसे, उपसरपंच, वारेग्रामपंचायतीने नोटीस देऊन ही कंपनी आपली मनमानी करत आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या नदीचे पात्र कोरडे पडणार आहे. त्याचे परिणाम ग्रामस्थांसह वन्य प्राण्यांनाही भोगावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने या विषयी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.- महेश रामचंद्र म्हसे, ग्रामस्थ