शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

चिरनेरमध्ये गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:15 IST

चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक

- लोकमत न्यूज नेटवर्कउरण : चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे सहा बंब अविरतपणे प्रयत्न करीत होते. अखेर १५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत गोदाम पूर्णत: खाक झाले असून सुमारे १० कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, असे उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी सांगितले.उरण तालुक्यातील चिरनेर-भोम रस्त्यावर पी. पी. खारपाटील कंपनीचे गोदाम आहे. भल्यामोठ्या गोदामात कापूस आणि तूर आदी प्रकारातील कडधान्याचा साठा आयात-निर्यातीसाठी ठेवण्यात आला होता. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली. ज्वलनशील कापूस आणि कडधान्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच उरण पोलीस, उरण तहसीलदार आदींनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत कापूस आणि कडधान्य जळून भस्मसात असून सुमारे १० कोटी मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाल्याचा, तसेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाकडून वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलीस पथक अधिकाऱ्यांसह तैनात करण्यात आले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.