शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरमध्ये गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:15 IST

चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक

- लोकमत न्यूज नेटवर्कउरण : चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे सहा बंब अविरतपणे प्रयत्न करीत होते. अखेर १५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत गोदाम पूर्णत: खाक झाले असून सुमारे १० कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, असे उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी सांगितले.उरण तालुक्यातील चिरनेर-भोम रस्त्यावर पी. पी. खारपाटील कंपनीचे गोदाम आहे. भल्यामोठ्या गोदामात कापूस आणि तूर आदी प्रकारातील कडधान्याचा साठा आयात-निर्यातीसाठी ठेवण्यात आला होता. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली. ज्वलनशील कापूस आणि कडधान्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच उरण पोलीस, उरण तहसीलदार आदींनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत कापूस आणि कडधान्य जळून भस्मसात असून सुमारे १० कोटी मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाल्याचा, तसेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाकडून वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलीस पथक अधिकाऱ्यांसह तैनात करण्यात आले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.