शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

CoronaVirus News : काेराेनामुळे माेलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:07 IST

CoronaVirus News : जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

- आविष्कार देसाई

रायगड : काेराेनाच्या भीतीने अनेकांनी घरातील माेलकरणींना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या माेलकरणींना आपल्या कुटुंबांचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्न पडला आहे. सरकारने माेलकरीणीसारख्या असंघटित कामगारांसाठी काही तरी करावे, अशी मागणी हाेत आहे. काेराेनाच्या रुग्ण संख्येत दरराेज झपाट्याने वाढ हाेत आहे.जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या दिवसाला किमान १ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या चिंतेत भर पडली आहे. काही महिला या नाेकरी करतात. या महिला घरकामासाठी माेलकरीण ठेवतात. या माेलकरीण महिला एकाच वेळेला सुमारे पाच घरांमध्ये काम करतात. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने या महिलांनाही कामावर येऊ नका असे, सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहण्याशिवाय पर्याय  नाही. राेजगार गेल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

घर कसे चालवावे याची चिंतामाेलमजुरी हाच व्यवसाय आहे. चार ठिकाणी काम केल्यावर महिन्याकाठी काही रक्कम हातात पडते. त्यावरच कुटुंबाचा चरितार्थ सुरू असताे. काेराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे कामावर येऊ नका, असे गृहनिर्माण साेसायटीवाले सांगतात. हातचे काम गेल्याने काय खायचे? असा प्रश्न आहे.

 एका घरातून मिळतात ७०० रुपयेकपडे-भांडी केल्यावर दीड हजार रुपये मिळतात. काही फक्त कपडे अथवा भांडी घासण्याचेच काम देतात. त्यासाठी ७०० रुपये पदरात पडतात. किमान तीन ते चार ठिकाणी काम मिळते. आता मात्र ठप्प झाले आहे.

अर्थकारणाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न पडला आहे. महागाईने सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक ओढाताण हाेत असताना आता तर हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे कुटुंबाचे पाेट कसे भरायचे, असा प्रश्न आहे. सरकारने आमच्या सारख्या असंघटित कामगारांचा विचार करणे गरजेचे आहे.  - मनिषा पडीयार

तुम्ही चार ठिकाणी काम करायला जाता त्यामुळे काेराेनाचा फैलाव हाेऊ शकताे. तुम्ही कामावर येऊ नका, असे साेसायटीवाले सांगतात. त्यामुळे आमचा राेजगार हिरावला गेला आहे. आमच्यासह आमच्या कुटुंबाची काळजी असल्याने आम्ही काेराेनाचे नियम पाळताे.             - वंदना म्हात्रे

सुरुवातीला चार-पाच घरातील काम करता यायचे. त्यामुळे महिन्याला चांगले पैसे मिळायचे; परंतु काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वच धास्तावले आहेत. आम्ही ज्या ठिकाणी काम करताे त्यांनीच सांगितले की, काही दिवस कामावर येऊ नका. काेराेनाचे संकट अजून किती दिवस राहणार, देव जाणे.- सायली निगम 

टॅग्स :alibaugअलिबाग