शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

वीज मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकांनी धरले धारेवर

By admin | Updated: October 17, 2015 23:40 IST

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभालाच शहरातील विजेचा खेळखंडोबा झाल्यावर पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील व युवक काँग्रेस संघटना व नागरिकांनी आक्रमक होत

पेण : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभालाच शहरातील विजेचा खेळखंडोबा झाल्यावर पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील व युवक काँग्रेस संघटना व नागरिकांनी आक्रमक होत पेण वीज मंडळावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा करताच वीज मंडळाचे अधिकारीच नगराध्यक्षाच्या दालनात उपस्थित झाले. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पेण नगरपालिका सभागृहात बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी भूमिगत योजना कुठे गायब झाली, या नगराध्यक्षांच्या सडतोड प्रश्नांवर येत्या दोन-चार दिवसांत भूमिगत योजनेचे काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.केंद्र शासनाच्या विशेष निधीतून मंजूर झालेली पेण शहरांची भूमिगत वीज योजना असून, महावितरण कंपनीचे अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून याबाबत चालढकल करीत आहेत. पेण शहरात वारंवार खंडित होणारी वीज, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरची झालेली दयनीय अवस्था, अपुरे कर्मचारी, विजेची भरमसाठ वाढीव बिले याबाबत नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता.केंद्र शासनाच्या विशेष निधीतून ७.५० कोटींची योजना थाटामाटात उद्घाटन होऊन वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उलटूनदेखील कामकाज बंद होते. शहरासाठी पालिकेने न. पा. फंडातून ३४.५० लाखांची हायमास्ट पथदीप योजना कार्यान्वित करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकली आहे. शहराच्या प्रमुख पाच चौकांत उजेड राहावा, असा उपदेश आहे. याशिवाय कासार तलाव व अन्य ठिकाणी ५० पोल उभारून एलईडी पथदिवे लावून अधिक उजेडाची व्यवस्था मार्गी लावली आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होणे, महावितरण कंपनीचा शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर व विजेच्या खांबावरच्या वीजवाहिन्या जीर्ण व अनेक ठिकाणी स्पार्किंग अशा समस्या असून, याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बऱ्याच भागातले ट्रान्सफॉर्मर जीर्ण अवस्थेत असून, त्यांचे मॉडीफिकेशन झालेले नाही. त्याचबरोबर वीज खंडित होण्याच्या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. नवरात्री उत्सवात पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेत पाच तास वीज गायब झाल्याने अनेक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांवर पाणी पडले.