शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये- तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 02:18 IST

मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क असून, मतदानाद्वारे आपण लोकशाही मार्गाने आपल्या आवडीचा उमेदवार निवडून त्या व्यक्तीस जनसेवा करण्याची संधी देत असतो.

आगरदांडा : मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क असून, मतदानाद्वारे आपण लोकशाही मार्गाने आपल्या आवडीचा उमेदवार निवडून त्या व्यक्तीस जनसेवा करण्याची संधी देत असतो. तूर्तास हा बहिष्कार मागे घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी २१ आॅक्टोबर रोजी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी केले आहे. या भागातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने त्यांचे मन वळविण्यासाठी तहसीलदारांनी सभा घेऊन नागरिकांची मने वळवण्याचा प्रयत्न के ला.मुरुड नगरपरिषदेने पावसाचे पाणी वाहून नेणारा नाला हा अरुंद व आखूड बांधून पाणी जाण्याचा मार्ग अडवल्यामुळे व उपोषण करूनही नाला न तोडल्यामुळे संतप्त झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस (शेगवाडा) परिसरातील नागरिकांनी २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आल्याने मुरुड शहरात खळबळ उडाली होती. प्रशासनाकडून येथील लोकांचे मन वळविण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस (शेगवाडा) परिसरातील नागरिकांची सभा साई मंदिरात संपन्न झाली. या वेळी तहसीलदार गमन गावीत यांनी बहिष्कार मागे घेऊन शासनाच्या कामात मदत करा, आपली नाला तोडण्याची मागणी रास्त आहे; परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे उचित नाही. आपले म्हणणे जसेच्या तसे आम्ही जिहाधिकाऱ्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी मुख्याधिकारी अमित पंडित यांनी आपले प्रकरण मला ज्ञात असून आजच्या वेळी आचारसंहिता असल्याने मी कोणताही निर्णय देऊ शकत नाही, तरी येथील नागरिकांनी बहिष्कार मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले. या वेळी या सभेत उपस्थित नागरिकांनी जोपर्यंत नगरपरिषद चुकीच्या पद्धतीने बांधलेले बांधकाम तोडत नाही, तोपर्यंत आम्ही आपला निर्णय बदलणार नाही. आमचा हा मतदानावरील बहिष्कार प्रत्येक निवडणुकीत असणार आहे.मुरुड नगरपरिषदेने प्रारंभपत्रकाप्रमाणे काम करणे आवश्यक होते; परंतु मनमानी करून व अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम केल्याने या पावसात आमच्या घरात पाणी शिरले व नुकसान झाले, म्हणून प्रथम नाला तोडण्याचे लेखी आदेश द्या मगच आम्ही आमचा बहिष्कार मागे घेऊ, अशी ठाम भूमिका घेतल्याने कोणताही निर्णय न होता नागरिकांचा बहिष्कार कायम राहिला आहे. या वेळी मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर, निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संतोष पवार आदीसह अधिकारी, पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील, उपाध्यक्ष सुनील विरुकुड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी अमित पंडित यांनी आपले प्रकरण मला ज्ञात असून आजच्या वेळी आचारसंहिता असल्याने मी कोणताही निर्णय देऊ शकत नाही. तरी येथील नागरिकांनी बहिष्कार मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे यावेळी नागरिकांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक