शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:03 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : जानेवारी महिन्यामध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यासोबतच वीट व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याची बाब समोर आली आहे. त्यासोबतच अवकाळी पावसाचा फायदा घेत, कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून, कोरोना महामारीसोबतच बदलत्या हवामानाचा संकटामुळे कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यात बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्याकरिता तगादा लावलेला असतानाच, अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने, वीट व्यावसायिकांना मजुरांचे दैनंदिन वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर अवकाळी पावसाचा फायदा घेत, दुसरीकडे महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडून रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्याचा धडाका लावला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते. मात्र, अवकाळी पावसाने हे पाणी सावित्री व काळ नदीपात्रात मिसळल्यास अनेक गावांच्या पाणी योजनांना त्याचा फटका बसून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परिणामी, प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड