शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:03 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : जानेवारी महिन्यामध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यासोबतच वीट व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याची बाब समोर आली आहे. त्यासोबतच अवकाळी पावसाचा फायदा घेत, कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून, कोरोना महामारीसोबतच बदलत्या हवामानाचा संकटामुळे कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यात बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्याकरिता तगादा लावलेला असतानाच, अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने, वीट व्यावसायिकांना मजुरांचे दैनंदिन वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर अवकाळी पावसाचा फायदा घेत, दुसरीकडे महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडून रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्याचा धडाका लावला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक पाणी काळ नदी व सावित्री नदी पात्रात मिसळू नये, याकरिता दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करून टेमघर नदीपात्राचे पाणी अडविले जाते. मात्र, अवकाळी पावसाने हे पाणी सावित्री व काळ नदीपात्रात मिसळल्यास अनेक गावांच्या पाणी योजनांना त्याचा फटका बसून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परिणामी, प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड