शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बाळगंगा प्रकल्पाचा अंतिम निवाडा रद्दबातल करा

By admin | Updated: August 26, 2015 00:07 IST

बाळगंगा धरण प्रकल्पाच्या अंतिम निवाड्यात असंख्य त्रुटी असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या या निवाड्यातून हाती काहीच लागले नाही. संकलनात प्रत्यक्षात असलेली ३,४४३ कुटुंबांपैकी

पेण : बाळगंगा धरण प्रकल्पाच्या अंतिम निवाड्यात असंख्य त्रुटी असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या या निवाड्यातून हाती काहीच लागले नाही. संकलनात प्रत्यक्षात असलेली ३,४४३ कुटुंबांपैकी २,२१२ कुटुंबांची नोंदी आल्या आहेत. उर्वरित १,१९७ कुटुंबांच्या नोंदीच नसल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पदरी काय पडले, या निराशेच्या समस्येने ग्रासलेल्या बाधित कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संतप्त बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी शासनाच्या उच्चस्तरीय अधिकारीवर्गाला फैलावर घेऊन आपल्या संतप्त भावना प्रकट केल्या. बाळगंगेचा अंतिम निवाडा चुकीचा असून तो रद्दबातल करून नव्याने संकलन नोंदी करण्याची आग्रही मागणी चार तास चाललेल्या वादळी बैठकीत वरसई वैजनाथ मंदिरात केली आहे. त्यामुळे बाळगंगा धरण प्रकल्प पाणी पुन्हा पेटणार असून येत्या ७ सप्टेंबरपर्यंत व्यापक आंदोलन करण्याच इशारा आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत दिला आहे. बाळगंगा धरण पाणीप्रश्न भविष्यात पेटणार असून उभ्या राहणाऱ्या नवीन वसाहती पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरात व्यापारी तत्त्वावर होणार आहे. धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम बाकी आहे. मात्र धरण पूर्णत्वास येत असताना बाळगंगा प्रकल्पग्रस्त उघड्यावरच आहेत. अंतिम निवाड्यात १३ गावे, ९ वाड्यांवरची प्रकल्पग्रस्तांची संसाधने, झाडे, जमीन, घरे यांच्या नोंदीच निवाड्यात न आल्याने बाळगंगा प्रक ल्पग्रस्त न घरका न घाटका अशा केविलवाण्या अवस्थेत आहेत. जमिनीला अल्प मोबदला, घरांचे मूल्यांकन नाही व १९९७ कुटुंबांशिवाय शेतमजूर, भूमीहिन, आदिवासीच्या वनजमिनी, झाडे, मंदिर, समाजमंदिर, शाळा, विहिरी, इतर पाणवठे, यांच्या नोंदीबाबत अक्षम्य चुका व उलटसुलट नोंदी पडल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत. जाहीर झालेला अंतिम निवाडा रद्द करून नव्याने संकलन करा, अशी वादळी चर्चा सभेमध्ये झाली. संसाधनाच्या नोंदीसाठी नव्याने प्रयत्न करून हा निवाडाच रद्दबातल करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.