शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

आॅरेंज स्मार्ट सिटी प्रकल्प जनसुनावणी रद्द करा

By admin | Updated: July 9, 2017 02:04 IST

आॅरेज स्मार्ट सिटी लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)वतीने मंगळवार,

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आॅरेज स्मार्ट सिटी लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)वतीने मंगळवार, ११ जुलै रोजी आयोजित केलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व आदिवासींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांच्याकडे केली आहे. याबाबत सोमवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे मलिकनेर यांनी सांगितले. पेण तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून ही औद्योगिक वसाहत उभारण्याचे प्रयोजन आहे. त्याकरिताची ही पर्यावरण विषयक जनसुनावणी नेमकी कुठे आहे? याची माहिती देण्यात आलेली नाही, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा(एमपीसीबी)कडून देण्यात आलेले दस्तावेज व अहवाल पूर्णपणे इंग्रजीमध्ये असल्याने ग्रामस्थ व विशेषत: आदिवासी बांधवांकरिता अनाकलनीय आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या भात लावण्यांचा हंगाम सुरू असल्याने शेतातील कामे टाकून सुनावणीकरिता येणे शेतकऱ्यांना केवळ अशक्य असल्याचे पाटील यांनी या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मलिकनेर यांच्या निदर्शनास आणून दिले.पेण तालुक्यातील बळवली, गोविर्ले, आंबेघर, शेणे, विराणी, बोरगाव, कोपर, आंबिवली, हमरापूर, मुंगोशी, पडाले, बेलकडे या बारा गावांतील जागेवर, आॅरेंज स्मार्ट सिटी इन लि. या कंपनीच्या मार्फत औद्योगिक वसाहत उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे ५ हजार ९५० आदिवासी बांधव बाधित होऊन विस्थापित होऊ शकतात. प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवार, ११ जुलै २०१७ रोजी आयोजित केली असल्याचे पत्र अदिवासी व ग्रामस्थांना २२ जून २०१७ रोजी कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत देण्यात आले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) लेअरहेडवरील उप प्रादेशिक अधिकारी रायगड यांच्या सहीचे पत्रक ग्रामपंचायतींच्या शिपायाकडे सुपूर्त केले. त्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का अथवा सरपंच, ग्रामसेवक यांची पोचही सगळ्या ग्रामपंचायतीतून घेण्याची तसदी कंपनी वा एमपीसीबीने घेतलेली नसल्याचे कार्यकर्ते संजय डंगर यांनी सांगितले.पावसात पर्यावरण सुनावणी ठेवून ती उरकण्याचा घाटजुलै महिना हा भात लावणीचा हंगाम आहे. रायगड जिल्ह्यात जून ते नोव्हेंबर हा कालावधी अतिवृष्टी, पूर, आपत्ती तसेच शेतीच्या हंगामामुळे ग्रामीण शेतकरी व आदिवासींसाठी व्यस्त कालावधी आहे. या भर पावसाच्या कालावधीत जनसुनावणी आयोजित करणे म्हणजे एक घाई गडबडीत शासकीय औपचारिकता पूर्ण करुन सुनावणी उरकण्याचा हा घाट आहे. शेतकऱ्यांना वा बाधित प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून पर्यावरणाच्या ना हरकत दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घेणे, असा स्पष्ट हेतू दिसतो. पर्यावरण जनसुनावणीचे पीठासीन अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून ही प्रक्रिया सजग व निपक्षपाती पार पाडावी ही अपेक्षा आहे. परिणामी, ही घाईतील ११ जुलै २०१७ रोजी आयोजित सुनावणी रद्द करावी, अशी मागणी केली आहे.आदिवासींच्या हाती ४९४ पानी इंग्रजीतील अहवालप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांंच्या पत्रासोबत, ‘ड्राफ्ट ईआयए रिपोर्ट आॅफ आॅरेंज स्मार्ट सिटी’ हा ४९४ पानांचा इंग्रजीमधील अहवाल, ‘व्हॉल्यूम २ अनेक्चर टू द ईआयए रिपोर्ट आॅफ आॅरेंज स्मार्ट सिटी’हासुद्धा इंग्रजीमधील ४५० पानांचा संच,‘एक्झिकेटिव्ह समरी आॅफ इन्व्हीरॉनमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’ तोही ४४ पानांचा इंग्रजीतील अहवाल, कार्यकारी सारांश पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल एकूण ४३ पानांचा त्रोटक अहवाल असे दस्तावेज देण्यात आले असल्याचे मुंगोशी ग्रामपंचायत सदस्य हरिष पाटील यांनी सांगितले.अहवाल स्थानिक भाषेत देणे बंधनकारकसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण खात्याने वेळोवेळी काढलेल्या शासकीय निर्णयांनुसार प्रकल्पग्रस्तांना पर्यावरण मूल्यांकन आघात अहवाल स्थानिक भाषेत संपूर्ण भाषांतरित करून मिळणे हा अधिकार आहे; परंतु आॅरेंज स्मार्ट सिटी इन. लि. या कंपनीमार्फत प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केलेला अहवाल,काही ग्रामपंचायतींना २२ जूनला तर काही ग्रामपंचायतींना ३० जूनला मिळाला. यामध्ये फक्त कार्यकारी सारांश मराठीत आहे. उर्वरित सर्व अहवाल इंग्रजीमध्ये आहेत.