शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

सुधागडात सात दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:10 IST

कनेक्टिंग इंडियाचा डिस्कनेक्टिंग तालुका ; कार्यालय बंद असल्याने नागरिक हैराण

n  विनोद भोईरलोकमत न्यूज नेटवर्कपाली : सुधागड तालुक्यात पाली येथे बीएसएनएलचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. ज्या नेटवर्कनी भारतात ग्रामीण भागात मोबाइल फोन आणि इंटरनेट वापरण्याची अभूतपूर्व क्रांती केली ते बीएसएनएल आता मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत आहे. पालीतील कार्यालय फक्त नावापुरते असून महिन्यातील २० ही दिवस हे कार्यालय बंदच असते. त्यामुळे फक्त बंद कार्यालयासाठी बीएसएनएल भाडे भरते का, हा खरे तर प्रश्न आहे.     पालीतील सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये म्हणजे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, कोषागार, दुय्यम निबंधक, साहाय्यक निबंधक, पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयांत बीएसएनएलचे नेट आहे; परंतु बीएसएनएलच्या नेहमीच्या ढिसाळ कारभारामुळे बहुतेक सर्व कार्यालयांत खासगी नेट कंपन्यांचे नेटवर्क सध्या कार्यरत आहे.

सुधागड तालुक्यातील बीएसएनएलच्या रेंज नसण्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य मोबाइल वापरकर्त्याना आणि दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालय यांना बसला आहे. जे सामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क वापरतात त्यांना महिन्यातून फक्त १० ते १५ दिवसच रेंज असते, अशी तक्रार केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे रिचार्ज सुधागडवासीयांचे वाया जात असून सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालयात बीएसएनएलच्या लीज लाइन असल्याने आणि त्यांचे सर्व्हर फक्त बीएसएनएलवर चालत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकार मुंबई, पुणे येथून दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात; परंतु इंटरनेट नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या समस्येवर दुय्यम निबंधकदेखील हतबल झाले असून वारंवार अलिबाग बीएसएनएलला तक्रार करूनदेखील कारवाई होताना दिसत नाही. कोषागार कार्यालयात तर मागील १५ दिवसांपासून सर्व बिले आणि चलने नेट नसल्याने पडून असल्याची माहिती कोषागार अधिकारी गणेश रणपिसे यांनी दिली आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणीच नेटवर्क नाही तर ग्रामीण भागात कधी मिळणार, हा प्रश्न आहे. 

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचेबीएसएनएलचे कोणत्याही प्रकारचे लक्ष सुधागड तालुक्यातील समस्येकडे नाही. त्यामुळे खासगी नेट कंपन्या यांना सुधागड तालुका आंदण दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असून नेट नसल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मार्फत मिळणारा महसूलदेखील बुडत आहे आणि सामान्य माणसाचे पैसे वाया जात आहेत.

पेण आणि नागोठणे यांच्यामध्ये कासूजवळ WTR लाइनचे काम चालू असल्याने इंटरनेट आणि रेंज सुधागड तालुक्यात नाही, परंतु गुरुवारपर्यंत रेंज यायला पाहिजे होती.- सतीश कोल्हे, एरिया नेटवर्क इंजिनीअर

टॅग्स :Raigadरायगड