शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:14 IST

३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत.

- संजय करडेमुरु ड जंजिरा : १ जून ते ३१ जुलै मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाºयावरच होत्या; परंतु १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, ३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. आधीच दोन महिने मासेमारीबंदी आणि आता समुद्र खवळल्याने बोटी किनारी लागल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.मुरु ड तालुक्यातील मुरु ड शहर, एकदरा, आगरदांडा, दिघी या भागांची पाहणी केली असता, बहुसंख्य बोटी किनाºयाला लागल्या असून, वाºयाचा वेग कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत. मुरु ड तालुक्यात छोट्या व मोठ्या बोटींची संख्या ६५० आहे, तर इतर बंदरातूनसुद्धा आलेल्या बोटी या आगरदांडा व दिघी बंदरात नांगरण्यात येतात.खोल समुद्रात तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने तातडीने जिथे किनारा जवळ असेल अशा ठिकाणी आम्ही बोटी लावल्या व स्वत:चे व बोटीचे संरक्षण केल्याचे कैलास कोटकर व संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले. वाºयाचा वेग जास्त असल्याने समुद्रात टाकलेले जाळे हे आपोआप गुंडाळले गेल्याने ते बोटीवर खेचताना खूप ताकद लावावी लागली. तर काही ठिकाणी जाळे खेचता येत नसल्याने अखेर कापावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे मच्छीमार सांगतात.सध्या आगरदांडा बंदरात हर्णे, मुरुड व रत्नागिरी येथील बोटी तर दिघी बंदरात डहाणू, सातपाटी, पालघर आदी ठिकाणच्या बोटी शाकारण्यात आल्या आहेत. यामुळे बंदरात बोटींची संख्या जास्त दिसून येत आहे. ३ आॅगस्टपासून वाहणारे जोरदार वारे अद्यापपर्यंत शांत झालेले नाहीत, त्यामुळे बोटी किनाºयावर आहेत. आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.सिमेंट काँक्रीटचे बंधारेही तुटलेजोरदार वाºयांचा परिणाम किनारीभागालाही बसला आहे. मुरु ड समुद्रकिनारी असणारी सुरु ची बाग भरतीच्या लाटांमुळे, पाणी किनारी घुसल्याने उन्मळून पडली आहे.जोरदार लाटांच्या धडकेमुळे सिमेंट काँक्र ीटचे बंधारेसुद्धा तुटले असून लहान जेटींचे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडून येणाºया वाºयाचा वेग अधिक असल्याने बोटींचेही नुकसान होत आहे.ताशी ६० कि.मी. वाहणाºया सुसाट वाºयामुळे होड्यांचे तसेच मासेमारीच्या जाळ्यांचेही नुकसान होत आहे. जाळी एकमेकांत गुंतत असल्याने समुद्रातच तोडून परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या