शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:14 IST

३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत.

- संजय करडेमुरु ड जंजिरा : १ जून ते ३१ जुलै मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाºयावरच होत्या; परंतु १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, ३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. आधीच दोन महिने मासेमारीबंदी आणि आता समुद्र खवळल्याने बोटी किनारी लागल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.मुरु ड तालुक्यातील मुरु ड शहर, एकदरा, आगरदांडा, दिघी या भागांची पाहणी केली असता, बहुसंख्य बोटी किनाºयाला लागल्या असून, वाºयाचा वेग कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत. मुरु ड तालुक्यात छोट्या व मोठ्या बोटींची संख्या ६५० आहे, तर इतर बंदरातूनसुद्धा आलेल्या बोटी या आगरदांडा व दिघी बंदरात नांगरण्यात येतात.खोल समुद्रात तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने तातडीने जिथे किनारा जवळ असेल अशा ठिकाणी आम्ही बोटी लावल्या व स्वत:चे व बोटीचे संरक्षण केल्याचे कैलास कोटकर व संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले. वाºयाचा वेग जास्त असल्याने समुद्रात टाकलेले जाळे हे आपोआप गुंडाळले गेल्याने ते बोटीवर खेचताना खूप ताकद लावावी लागली. तर काही ठिकाणी जाळे खेचता येत नसल्याने अखेर कापावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे मच्छीमार सांगतात.सध्या आगरदांडा बंदरात हर्णे, मुरुड व रत्नागिरी येथील बोटी तर दिघी बंदरात डहाणू, सातपाटी, पालघर आदी ठिकाणच्या बोटी शाकारण्यात आल्या आहेत. यामुळे बंदरात बोटींची संख्या जास्त दिसून येत आहे. ३ आॅगस्टपासून वाहणारे जोरदार वारे अद्यापपर्यंत शांत झालेले नाहीत, त्यामुळे बोटी किनाºयावर आहेत. आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.सिमेंट काँक्रीटचे बंधारेही तुटलेजोरदार वाºयांचा परिणाम किनारीभागालाही बसला आहे. मुरु ड समुद्रकिनारी असणारी सुरु ची बाग भरतीच्या लाटांमुळे, पाणी किनारी घुसल्याने उन्मळून पडली आहे.जोरदार लाटांच्या धडकेमुळे सिमेंट काँक्र ीटचे बंधारेसुद्धा तुटले असून लहान जेटींचे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडून येणाºया वाºयाचा वेग अधिक असल्याने बोटींचेही नुकसान होत आहे.ताशी ६० कि.मी. वाहणाºया सुसाट वाºयामुळे होड्यांचे तसेच मासेमारीच्या जाळ्यांचेही नुकसान होत आहे. जाळी एकमेकांत गुंतत असल्याने समुद्रातच तोडून परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या