शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:14 IST

३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत.

- संजय करडेमुरु ड जंजिरा : १ जून ते ३१ जुलै मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाºयावरच होत्या; परंतु १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, ३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. आधीच दोन महिने मासेमारीबंदी आणि आता समुद्र खवळल्याने बोटी किनारी लागल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.मुरु ड तालुक्यातील मुरु ड शहर, एकदरा, आगरदांडा, दिघी या भागांची पाहणी केली असता, बहुसंख्य बोटी किनाºयाला लागल्या असून, वाºयाचा वेग कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत. मुरु ड तालुक्यात छोट्या व मोठ्या बोटींची संख्या ६५० आहे, तर इतर बंदरातूनसुद्धा आलेल्या बोटी या आगरदांडा व दिघी बंदरात नांगरण्यात येतात.खोल समुद्रात तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने तातडीने जिथे किनारा जवळ असेल अशा ठिकाणी आम्ही बोटी लावल्या व स्वत:चे व बोटीचे संरक्षण केल्याचे कैलास कोटकर व संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले. वाºयाचा वेग जास्त असल्याने समुद्रात टाकलेले जाळे हे आपोआप गुंडाळले गेल्याने ते बोटीवर खेचताना खूप ताकद लावावी लागली. तर काही ठिकाणी जाळे खेचता येत नसल्याने अखेर कापावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे मच्छीमार सांगतात.सध्या आगरदांडा बंदरात हर्णे, मुरुड व रत्नागिरी येथील बोटी तर दिघी बंदरात डहाणू, सातपाटी, पालघर आदी ठिकाणच्या बोटी शाकारण्यात आल्या आहेत. यामुळे बंदरात बोटींची संख्या जास्त दिसून येत आहे. ३ आॅगस्टपासून वाहणारे जोरदार वारे अद्यापपर्यंत शांत झालेले नाहीत, त्यामुळे बोटी किनाºयावर आहेत. आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.सिमेंट काँक्रीटचे बंधारेही तुटलेजोरदार वाºयांचा परिणाम किनारीभागालाही बसला आहे. मुरु ड समुद्रकिनारी असणारी सुरु ची बाग भरतीच्या लाटांमुळे, पाणी किनारी घुसल्याने उन्मळून पडली आहे.जोरदार लाटांच्या धडकेमुळे सिमेंट काँक्र ीटचे बंधारेसुद्धा तुटले असून लहान जेटींचे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडून येणाºया वाºयाचा वेग अधिक असल्याने बोटींचेही नुकसान होत आहे.ताशी ६० कि.मी. वाहणाºया सुसाट वाºयामुळे होड्यांचे तसेच मासेमारीच्या जाळ्यांचेही नुकसान होत आहे. जाळी एकमेकांत गुंतत असल्याने समुद्रातच तोडून परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या