शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

योजना शासनाच्या ताब्यात दिल्याने फायदा, खासगी खारभूमी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:20 IST

कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे. रस्त्याअभावी निर्मनुष्य राहणारे हे सागर व खाडी किनारे यापूर्वी अतिरेक्यांची छुपी ठिकाणे झाली होती. आता या ठिकाणी स्थानिक शेतकºयांचा वावर वाढणार असल्याने ही ठिकाणे आता अतिरक्यांची छुपी ठिकाणे राहणार नाहीत. परिणामी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा सुरक्षा अनाहूतपणे मजबूत होऊ शकणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारण यंत्रणांना देखील या किनारीभागात सत्त्वर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात असणाºया विहिरी आणि तलावांचे पाणी गोडे होऊ न पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन, दुबार भातपिके घेणे शक्य होणार असल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान देखील उंचावणार आहे.सततच्या भरती ओहोटीमुळे कमकुवत झालेल्या खासगी खारभूमी योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर भातशेती क्षेत्र बाधित झाले आहे. कोकणातील ६४ खासगी खारभूमी योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या योजनांचे काम पूर्ण झाल्यावर एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली येणार, हाच केवळ एकमेव फायदा नाही,तर त्यासोबत अनेक लाभ किनारी विशेष: खारेपाटातील शेतकºयांना होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करताना, हे सर्व मुद्दे विचारात घेऊन, खासगी योजना शासनाच्या ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वेळकार खार (ठाणे), दिवाणखाडी (भिवंडी), बारपटल (भिवंडी) या तीन खासगी योजनांचा समावेश असून, त्यातून १५९ हेक्टर भातशेती क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून त्याकरिता ३६०.९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील डोंगरे, कुंभावली, धनसर, शिरगाव, पाम टेंबी, कोतवडे आणि डहाणू तालुक्यातील वरोर या सात योजनांच्या माध्यमातून ४२१ हेक्टर भातशेती क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता ९५५.६७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील १० योजनांमध्ये तोणदे (रत्नागिरी), गुहागर खालचपाट (गुहागर), तारळ (राजापूर), टेंभे (रत्नागिरी), वरवडे (ब)(रत्नागिरी), चिंचखरी फाटकवाडी (रत्नागिरी), फुणगुस (संगमेश्वर), मेढे (संगमेश्वर), कोढे (संगमेश्वर), ढोरले खेतमळी (रत्नागिरी) यांचा समावेश असून त्यायोगे ४३१.६७ हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता ११२४.८६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ योजना असून, त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील तेरावळे (ब), मागवणे मसुरे, कोठेवाडी, तुळस पाटील वाडी, खडपी वाडी, तुळस सावंतवाडा, मुणगे, परुळे कोळजाई, वेंगुर्ला आणि टेंबवली (राणेवाडी), मोहूळ गाव (देवगड) या योजनांचा समावेश असून, ५४३ हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता १५४०.७६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या ६४ खासगी योजनांमध्ये कोकणातील सर्वाधिक ३३ खासगी खारभूमी योजना एकट्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये पेण तालुक्यातील कोप्रोली, कासू पांडापूर, दादर, पाटणी-पांडापूर, काळी सीमादेवी, बोरी, वरेडी खुंटेपाडा, शेतजुई बेणसे, डोलवी दबाबा आणि दुष्मी खारपाडा या दहा योजनांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरी, खातीवरा, मोठापाडा शहापूर, चरी गोपचरी, भिलजी बोरघर, वासखार, रांजणखार, रामराज, हशिवरे बंधारा, कालव या दहा योजनांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील वशेणी नवखार भेंडी, दिघोडा,चिखली भोम,कोणी केळवणे, पुनाडे, कडापे दांगोटी, सांगपालेखार, हरिश्चंद्र पिंपळे, गोवठणे, पिरकोण आणि हाळ (रोहा), लक्ष्मीखार तेलवडे (मुरुड),खरसई (म्हसळा) अशा या ३३ योजनांच्या माध्यमातून एकूण ४ हजार ७८०हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता १०९ कोटी ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Raigadरायगड