शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

न्हावा शिवडी सागरी सेतूबाधितांचे आंदोलन मागे; सर्वपक्षीय संघर्ष समितीची आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 01:44 IST

या बैठकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.

उरण : एमएमआरडीएच्या न्हावा शिवडी सागरी सेतूबाधित न्हावा, गव्हाण, घारापुरी गावातील पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याच्या मागणीबाबत नेमण्यात आलेल्या मच्छीमार समन्वय समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन कार्यकारी अभियंता वि. अ. जांभळे यांनी गुरुवारच्या बैठकीत दिले आहे. दिलेल्या लेखी आश्वासनानंतरच न्हावा शिवडी सागरी सेतूबाधितांचा टाटा कंपनीच्या कार्यालयावर २९ जानेवारी रोजी काढण्यात येणारा मोर्चा मागे घेतला..

आंदोलन आणि मोर्चा मागे घेण्यासाठी एमएमआरडीएमार्फत पोलीस जिल्हा प्रशासनाकडूून दबावतंत्राचाही अवलंब केला जात होता. मात्र स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांना दाद दिली नव्हती. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलावली होती. एमएमआरडीएच्या मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त के.एच. गोविंदराज, मुख्य अभियंता विशाल जांभळे, अभियंता गणेश देशपांडे, सहायक अभियंता बी.ए. गायकवाड, तर सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, न्हावा ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष आशिष पाटील, नंदकुमार कोळी, हनुमान भोईर, किसन पाटील, सी.एल. ठाकूर, कर्वेश पाटील, किरण पाटील, विजय घरत, सचिन घरत,आदी उपस्थित होते. 

या बैठकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. ग्रामपंचायतीकडून पारंपरिक मच्छीमारांना देण्यात येणारा दाखला ग्राह्य धरण्यात यावा, याबाबत महिन्यात निर्णय घेण्यात यावा यासाठी आग्रही भूमिका मांडतानाच भूमिपुत्रांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा प्रकल्पाचे कामकाज बंद पाडण्याचा कडक इशाराही देण्यात आला. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस लेखी आश्वासनानंतरच मोर्चा मागे घेण्यात आला असल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली.