शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आगरी भाषा जतन करण्याचे प्रयत्न आवश्यक

By admin | Updated: February 17, 2017 02:15 IST

आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने

अलिबाग : आगरी माणसाची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची कलात्मकता सारे काही कोकणाशी नाते सांगणारे असल्याने ठाणे, मुंबई व रायगड या तीन जिल्ह्यात वस्ती करून राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे. तरुणांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे, आगरी भाषा दिवसेंदिवस लोप पावत आहे, ती जतन करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आगरी बोली अभ्यासक व लेखक तथा आगरी कोषकार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पी.एन.पी. महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने तीन दिवसांच्या आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, वेगळेपण जपणारा आगरी समाज सर्व ठिकाणी विखुरलेला आहे. आगरी समाज आगरीपध्दतीच्या जेवणासाठी खूप प्रसिद्ध आहे. आगरी तरु णांनी जुनी संस्कृती जपली पाहिजे. समाजाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम पीएनपी संस्था करत असते. आगरी समाजाने लग्न समारंभासाठी कर्जबाजारी होऊन थाटामाटात मुलांचा लग्न सोहळा करू नये, तसेच हळदी समारंभाला दारू, मटण ही आपली संस्कृती नाही. पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करावा आणि चांगली प्रथा आगरी समाजात सुरू व्हावी असे नमूद केले. याप्रसंगी डॉ. अनिल बांगर, डॉ. गणेश अग्निहोत्री, संजीवनी नाईक, कैलास पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.आगरी बोली परिचय प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. मराठी भाषेचा उगम, मराठी भाषेतील विविध बोली, आगरी बोली, उगम, इतिहास, परिचय, व्याकरण, सांस्कृतिक संदर्भ, आगरी लोकसाहित्य, आगरी साहित्य आणि साहित्यिक अशा विशेष अभ्यासक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन वाङ्मय समिती प्रमुख प्रा. डॉ. ओमकार पोटे यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी मानले. या वेळी आगरी बोली संशोधक प्रा. डॉ. अनिल बांगर, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, आगरी लेखक कैलास पिंगळे, उपप्राचार्या संजीवनी नाईक, मराठी विभाग प्रमुख नम्रता पाटील, वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)