शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:53 IST

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे.

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराजांनी सुरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले असल्याने बोलले जाते. मात्र तासभर डोंगर चढउतार करावा लागत असताना देखील असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.शके १९३७ मध्ये सह्याद्रीच्या सुळक्यावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची रूपे तेथे पाहायला मिळतात. या शिवमंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत, त्या कुंडामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशा प्रकारे अगदी जवळजवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती २० वर्षांपासून परिसराला झाल्याचे बोलले जात आहे. स्वामी समर्थ यांचे बदलापूर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले. गडाची पाहणी करीत असताना त्यांना नेरळकडील बाजूस मातीमध्ये गाडलेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खडे यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवून खोदकाम सुरू केले.त्या वेळी तेथे शिवलिंग आणि पाण्याचे कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत.परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त दीड तासाची पायपीट करून दर्शनासाठी येतात.येथे पोहचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असून देखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देवून दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाइप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर मंदिराजवळ पोहचतो. सध्या तेथील वातावरण प्रचंड आल्हाददायक असून सभोवताली प्रचंड हिरवाई नटली आहे.