शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:53 IST

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे.

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराजांनी सुरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले असल्याने बोलले जाते. मात्र तासभर डोंगर चढउतार करावा लागत असताना देखील असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.शके १९३७ मध्ये सह्याद्रीच्या सुळक्यावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची रूपे तेथे पाहायला मिळतात. या शिवमंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत, त्या कुंडामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशा प्रकारे अगदी जवळजवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती २० वर्षांपासून परिसराला झाल्याचे बोलले जात आहे. स्वामी समर्थ यांचे बदलापूर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले. गडाची पाहणी करीत असताना त्यांना नेरळकडील बाजूस मातीमध्ये गाडलेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खडे यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवून खोदकाम सुरू केले.त्या वेळी तेथे शिवलिंग आणि पाण्याचे कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत.परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त दीड तासाची पायपीट करून दर्शनासाठी येतात.येथे पोहचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असून देखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देवून दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाइप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर मंदिराजवळ पोहचतो. सध्या तेथील वातावरण प्रचंड आल्हाददायक असून सभोवताली प्रचंड हिरवाई नटली आहे.