शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:53 IST

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे.

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. शिवाजी महाराजांनी सुरत आणि कल्याणची लूट केल्यानंतर तो खजिना या विकटगडावर ठेवला होता. त्या अर्थाने वित्त म्हणून या भगवान शंकराचे नाव वित्तेश्वर असे पडले असल्याने बोलले जाते. मात्र तासभर डोंगर चढउतार करावा लागत असताना देखील असंख्य शिवभक्त वित्तेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.शके १९३७ मध्ये सह्याद्रीच्या सुळक्यावर शिवमंदिर उभारले गेले. मुंबई गॅझेटमध्ये नोंद असलेल्या या तीन शिवलिंग मंदिराची बांधणी शालिवाहन राजाने केली असल्याची नोंद असून एकाच ठिकाणी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची रूपे तेथे पाहायला मिळतात. या शिवमंदिराचे विशेष म्हणजे डोंगराच्या खोल दरीकडील बाजूला दगडामध्ये चार पाण्याची कुंड आहेत, त्या कुंडामध्ये हे मंदिर आहे. त्या कुंडावरील दगडावर अनेक चित्रे कोरली असून पाण्याने कधीही महादेवाला अभिषेक घालता येईल अशा प्रकारे अगदी जवळजवळ ती कुंड आहेत. या भगवान शंकर मंदिराची माहिती २० वर्षांपासून परिसराला झाल्याचे बोलले जात आहे. स्वामी समर्थ यांचे बदलापूर येथील भक्त स्वामी सखा हे प्रथम या गडावर आले. गडाची पाहणी करीत असताना त्यांना नेरळकडील बाजूस मातीमध्ये गाडलेली मंदिरासारखी भासावी अशी कमान दिसली. त्यांनी नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे चालक असलेले राजाराम खडे यांच्या मदतीने अन्य सहकारी यांना सोबत घेवून खोदकाम सुरू केले.त्या वेळी तेथे शिवलिंग आणि पाण्याचे कुंड सापडले. आजही ते मंदिर अर्धवट अवस्थेत असून जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न शिवभक्त करीत आहेत.परंतु एकाच ठिकाणी तीन शिवलिंग असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त दीड तासाची पायपीट करून दर्शनासाठी येतात.येथे पोहचण्यासाठी असलेले तिन्ही रस्ते अत्यंत खडतर असून देखील शिवभक्त तेथे श्रद्धेने भेट देवून दर्शन घेतात. नेरळ येथे रेल्वेने आल्यानंतर विकटगडावरील शिव मंदिरावर जाण्यासाठी एक सोपी वाट आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गाने वॉटरपाइप स्टेशनच्या पुढे चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर डोंगर उतरून आणि नंतर पुढील डोंगर चढून गेल्यावर मंदिराजवळ पोहचतो. सध्या तेथील वातावरण प्रचंड आल्हाददायक असून सभोवताली प्रचंड हिरवाई नटली आहे.