शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जि.प.बजेट’वर प्रशासनाची छाप

By admin | Updated: March 30, 2017 06:50 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजनांना कात्री लागली आहे. समाज, अपंग, महिला व बाल कल्याण आणि

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण योजनांना कात्री लागली आहे. समाज, अपंग, महिला व बाल कल्याण आणि पाणीपुरवठा योजनेसाठी ५३ टक्केची तरतूद कायम ठेऊन उर्वरित विभागांना मिळणाऱ्या निधीमधूनच नावीन्यपूर्ण योजना आखणी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनानेच नावीन्यपूर्ण योजनांची लिस्ट तयार केली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता प्रशासनाच्या बजेटनुसारच विकासाचा गाडा हाकलावा लागणार असल्याचे दिसून येते. बजेटवर प्रशासनाची छाप दिसत असल्याने सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असे चित्र निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प फक्त ४५ कोटी रुपयांचा राहणार असल्याचे वृत्त प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ४५ कोटी ३१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषेदचा बहुतांश महसूल देणारा भाग विलीन झाल्याने शतकी अर्थसंकल्प केवळ ४५ कोटी ३१ लाख रुपयांवर आला आहे. बांधकाम विभागासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद आताच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात हाच आकडा १५ कोटी ५० लाख रुपये होता. शिक्षण विभागासाठी एक कोटी ५० लाख रुपये गतवर्षी ३ कोेटी देण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या खात्यामध्ये गेल्या वर्षी अडीच कोटी रुपये टाकण्यात आले होते. यावर्षी दीड कोटी रुपयेच देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाला फक्त ७५ लाख देण्याची तरतूद प्रशासनाने केली आहे. हाच आकडा गेल्या वर्षी एक कोटी ९५ लाख रुपये असा होता.समाज कल्याण विभागासाठी (१० टक्के), अपंग कल्याण (३ टक्के), महिला व बाल कल्याण (१० टक्के) आणि पाणीपुरवठा योजनेसाठी (२० टक्के) अशी एकूण बजेटच्या ५३ टक्के निधीची तरतूद या विभागासाठी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. समाज कल्याण विभागासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अपंग कल्याण विभागासाठी ३ कोटी रुपये, महिला व बाल कल्याण ४ कोटी रुपये आणि पाणीपुरवठा योजनेसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्याता आली आहे. ५३ टक्के निधी व्यतिरिक्त असणाऱ्या विभागांना त्यांना मिळालेल्या निधीतून नावीन्यपूर्ण योजनांसाठी निधी खर्च करावा लागणार आहे.विशेष म्हणजे, योजना कोणत्या असाव्यात त्याही प्रशासनाने दिल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना त्यामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने एक प्रकारे सत्ताधाऱ्यांवर कडी केल्याचेच दिसून येते. सत्तेमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये मोठ्या संख्येने पहिल्यांदाच नवीन सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता किती विकास साधता येणार आहे, हे पुढील काळात समजणार आहे.नावीन्यपूर्ण योजनाउत्कृष्ट शाळा पुरस्कारउत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कारउत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कारउत्कृष्ट पाणीपुरवठा योजना पुरस्कारनियमानुसार बजेटपैकी ५३ टक्के निधी हा स्वंतत्र ठेवावा लागतो. त्या व्यतिरिक्त असणाऱ्या विभागांना निधीची तरतूद केली आहे. त्यामधूनच त्यांना नावीन्यपूर्ण योजनांवर खर्च करावा लागणार आहे.- अविनाश सावंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारीपनवेल महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेचा बहुतांश महसूल देणारा भाग विलीन झाल्याने शतकी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प केवळ ४५ कोटी ३१ लाख रुपयांवर आला आहे.