शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी दिलेले ८७ लाख पडून

By admin | Updated: September 3, 2015 23:28 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या जिल्हा नावीन्यता परिषदेच्या डोक्यातून एकही एनोव्हेटीव्ह आयडिया सत्यात उतरलेली नाही.

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या जिल्हा नावीन्यता परिषदेच्या डोक्यातून एकही एनोव्हेटीव्ह आयडिया सत्यात उतरलेली नाही. गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती, शिक्षण, जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा अशा क्षेत्रासाठी ८७ लाख रुपयांची तरतूद करूनही कामांचा पत्ताच नाही. नावीन्यता परिषदेचे सदस्य केवळ पद उपभोगण्यासाठीच आहेत का, असा सवालही त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हा नावीन्यता परिषदेची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर २०१० मध्ये नॅशनल कौन्सिलची स्थापना केली होती. नॅशनल कौन्सिलच्या शिफारशीनुसार ४ मार्च २०१४ रोजी स्टेट कौन्सिलची स्थापना केली. नव संकल्पनेचा आराखडा तयार करून त्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, प्रचार व प्रसार करणे, नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाळा, विद्यापीठे, संशोधन संस्था यामधून तज्ज्ञांद्वारे विद्यार्थी, तरुणवर्गाला मार्गदर्शन करुन पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे प्रमुख कार्य स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे आहे.स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण स्तरावर याची जागृती होणे गरजेचे असल्याने स्टेट इनोव्हेशन कौन्सिलला सहाय्यभूत ठरेल अशी जिल्हास्तरावर जिल्हा नावीन्यता परिषद अस्तित्वात आली आहे. जिल्हाधिकारी जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष असून १५ सदस्य त्यामध्ये आहेत. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी ०.५ टक्के नियतव्य या जिल्हा नावीन्यता परिषदेसाठी दिले आहे. २०१४-१५ साठी १४१ कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडे आहेत. त्यापैकी ०.१२५ टक्क्याप्रमाणे सुमारे १७ लाख, तर ०.५ टक्क्यांप्रमाणे सुमारे ७० लाख असे ८७ लाख रुपयांचा निधी पडून आहे.नावीन्यता परिषदेची उद्दिष्टे : सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ही परिषद नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करेल, जिल्हा स्तरावरील सर्व विभागाकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावेल, गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभावीपणे वापर करेल, तरुण बुध्दिजीवी वर्गाला नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी ही परिषद प्रवृत्त करेल आदी.नावीन्यता परिषदेला संधी : कृषी, फलोत्पादन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे शुध्द पाणी, आर्थिकवृध्दी, दारिद्र्य, असमानता, नागरीकरण, वित्त, दूरसंचार, सूक्ष्म जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्षेत्राचा विचार ही परिषद करु शकते.