शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

विकासासाठी दिलेले ८७ लाख पडून

By admin | Updated: September 3, 2015 23:28 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या जिल्हा नावीन्यता परिषदेच्या डोक्यातून एकही एनोव्हेटीव्ह आयडिया सत्यात उतरलेली नाही.

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापलेल्या जिल्हा नावीन्यता परिषदेच्या डोक्यातून एकही एनोव्हेटीव्ह आयडिया सत्यात उतरलेली नाही. गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती, शिक्षण, जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा अशा क्षेत्रासाठी ८७ लाख रुपयांची तरतूद करूनही कामांचा पत्ताच नाही. नावीन्यता परिषदेचे सदस्य केवळ पद उपभोगण्यासाठीच आहेत का, असा सवालही त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हा नावीन्यता परिषदेची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर २०१० मध्ये नॅशनल कौन्सिलची स्थापना केली होती. नॅशनल कौन्सिलच्या शिफारशीनुसार ४ मार्च २०१४ रोजी स्टेट कौन्सिलची स्थापना केली. नव संकल्पनेचा आराखडा तयार करून त्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे, प्रचार व प्रसार करणे, नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी स्थानिक शाळा, विद्यापीठे, संशोधन संस्था यामधून तज्ज्ञांद्वारे विद्यार्थी, तरुणवर्गाला मार्गदर्शन करुन पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे प्रमुख कार्य स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे आहे.स्टेट इनोव्हेशन कौन्सिलचे कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण स्तरावर याची जागृती होणे गरजेचे असल्याने स्टेट इनोव्हेशन कौन्सिलला सहाय्यभूत ठरेल अशी जिल्हास्तरावर जिल्हा नावीन्यता परिषद अस्तित्वात आली आहे. जिल्हाधिकारी जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष असून १५ सदस्य त्यामध्ये आहेत. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी ०.५ टक्के नियतव्य या जिल्हा नावीन्यता परिषदेसाठी दिले आहे. २०१४-१५ साठी १४१ कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडे आहेत. त्यापैकी ०.१२५ टक्क्याप्रमाणे सुमारे १७ लाख, तर ०.५ टक्क्यांप्रमाणे सुमारे ७० लाख असे ८७ लाख रुपयांचा निधी पडून आहे.नावीन्यता परिषदेची उद्दिष्टे : सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ही परिषद नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करेल, जिल्हा स्तरावरील सर्व विभागाकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावेल, गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभावीपणे वापर करेल, तरुण बुध्दिजीवी वर्गाला नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी ही परिषद प्रवृत्त करेल आदी.नावीन्यता परिषदेला संधी : कृषी, फलोत्पादन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे शुध्द पाणी, आर्थिकवृध्दी, दारिद्र्य, असमानता, नागरीकरण, वित्त, दूरसंचार, सूक्ष्म जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्षेत्राचा विचार ही परिषद करु शकते.