शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्याला ५१ टक्के पावसाची आवश्यकता

By admin | Updated: August 11, 2015 00:30 IST

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास शेतीचे मोठ्या संख्येने नुकसान होण्याची शक्यता आहे. नेहमीची सरासरी गाठण्यासाठी ५१ टक्के पावसाची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यावेळी जोरदार बरसून त्याने त्या महिन्याचा कोटा भरून काढला होता. पाऊस बरसल्याने शेतीच्या कामांनाही वेग येऊन बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. जुलै महिन्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात बरसून शेती आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र गेल्या दोन महिन्यात म्हणजे १ जून ते १० जुलै या कालावधीत एकूण २४ हजार ३०३ म्हणजेच सरासरी एक हजार ५१८.९५मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण ५० हजार २८२ म्हणजेच सरासरी तीन हजार १४२.६४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत बरसलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असले तरी शेतीच्या कामांसाठी अजून पावसाची गरज आहे. जिल्ह्यात भातपिकाचे एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे, तर नागली पिकाचे १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या पावसाला जोर नसला, तरी २० आॅगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पावसाने उघडीप दिल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता खंडाळे येथील शेतकरी नंदू शंकर सोडवे यांनी दिली. (प्रतिनिधी)