शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जिल्ह्याला ५१ टक्के पावसाची आवश्यकता

By admin | Updated: August 11, 2015 00:30 IST

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास शेतीचे मोठ्या संख्येने नुकसान होण्याची शक्यता आहे. नेहमीची सरासरी गाठण्यासाठी ५१ टक्के पावसाची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यावेळी जोरदार बरसून त्याने त्या महिन्याचा कोटा भरून काढला होता. पाऊस बरसल्याने शेतीच्या कामांनाही वेग येऊन बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. जुलै महिन्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात बरसून शेती आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र गेल्या दोन महिन्यात म्हणजे १ जून ते १० जुलै या कालावधीत एकूण २४ हजार ३०३ म्हणजेच सरासरी एक हजार ५१८.९५मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण ५० हजार २८२ म्हणजेच सरासरी तीन हजार १४२.६४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत बरसलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असले तरी शेतीच्या कामांसाठी अजून पावसाची गरज आहे. जिल्ह्यात भातपिकाचे एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे, तर नागली पिकाचे १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या पावसाला जोर नसला, तरी २० आॅगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पावसाने उघडीप दिल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता खंडाळे येथील शेतकरी नंदू शंकर सोडवे यांनी दिली. (प्रतिनिधी)