शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ५१ टक्के पावसाची आवश्यकता

By admin | Updated: August 11, 2015 00:30 IST

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास शेतीचे मोठ्या संख्येने नुकसान होण्याची शक्यता आहे. नेहमीची सरासरी गाठण्यासाठी ५१ टक्के पावसाची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यावेळी जोरदार बरसून त्याने त्या महिन्याचा कोटा भरून काढला होता. पाऊस बरसल्याने शेतीच्या कामांनाही वेग येऊन बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात मोठा ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. जुलै महिन्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात बरसून शेती आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या मात्र गेल्या दोन महिन्यात म्हणजे १ जून ते १० जुलै या कालावधीत एकूण २४ हजार ३०३ म्हणजेच सरासरी एक हजार ५१८.९५मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण ५० हजार २८२ म्हणजेच सरासरी तीन हजार १४२.६४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत बरसलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असले तरी शेतीच्या कामांसाठी अजून पावसाची गरज आहे. जिल्ह्यात भातपिकाचे एक लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे, तर नागली पिकाचे १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या पावसाला जोर नसला, तरी २० आॅगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पावसाने उघडीप दिल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता खंडाळे येथील शेतकरी नंदू शंकर सोडवे यांनी दिली. (प्रतिनिधी)