शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

तीस वर्षांत संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती नाही; जमीन कवडीमोल भावात विकण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:25 IST

समुद्र आणि खाडी लगतच्या भातशेतीत उधाणाचे खारेपाणी घुसून भातशेती नापीक होऊ नये, याकरिता समुद्र-खाडीकिनारे आणि त्या शेजारील गावांतील भातशेती यामध्ये समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) नव्याने बांधणे आणि अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधा-यांची नियमित दुरुस्ती करणे हे काम या सरकारच्या खारलॅन्ड विभागाकडून गेल्या ३० वर्षांपासून बंद करण्यात आले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : समुद्र आणि खाडी लगतच्या भातशेतीत उधाणाचे खारेपाणी घुसून भातशेती नापीक होऊ नये, याकरिता समुद्र-खाडीकिनारे आणि त्या शेजारील गावांतील भातशेती यामध्ये समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) नव्याने बांधणे आणि अस्तित्वात असलेल्या जुन्या बंधा-यांची नियमित दुरुस्ती करणे हे काम या सरकारच्या खारलॅन्ड विभागाकडून गेल्या ३० वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बांध फुटून समुद्राचे खारेपाणी घुसून शेकडो एकर भातशेती दरवर्षी नापीक होत आहे. अशा प्रकारे भातशेती नापीक करून ती कवडीमोल भावाने उद्योगांना देण्याचा घाट वरच्या पातळीवर सुरू असल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी केला आहे.सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या काळात समुद्र भरतीच्या उधाणाचे खारेपाणी अडवण्याकरिता समुद्र संरक्षक बंधारे लोकसहभागातून बांधून मुळात खारवट असणारी जमीन पिकती करण्यात आली आहे. शेतकºयांचा उदरनिर्वाह भातशेतीवर असल्याने दरवर्षी सामूहिक लोकसहभागातून, ग्रामीण भागातील पारंपरिक प्रचलित ‘झोळे’ पद्धतीने शेतकरी स्वत: भरती संरक्षक बंधाºयांची डागडुजी आणि दुरुस्ती करीत असत आणि त्यांतूनच राज्यातील सर्वाधिक भात पीक येथे येत असे आणि त्यामुळे ‘भाताचे कोठार’ असा नावलौकिक रायगड जिल्ह्यास प्राप्त झाला होता.१९६५मध्ये ही संरक्षक बंधाºयांची डागडुजी, दुरुस्ती आणि नवीन बंधारे बांधणे या कामाकरिता राज्य सरकारने स्वतंत्र खारलॅन्ड खात्याची निर्मिती केली. त्याअंतर्गत खारलॅन्ड बोर्डाच्या माध्यमातून ही कामे करण्यास प्रारंभ केला. या खात्याचे पहिले राज्यमंत्री अलिबागचेच अ‍ॅड. दत्ताजीराव खानविलकर हे होते. त्यांनी संपूर्ण कोकणात समुद्र संरक्षक बंधाºयांची खारलॅन्ड योजना प्रभावीपणे अमलात आणली होती. त्याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद होत असे. त्यातून रायगडसह संपूर्ण कोकणातील भातशेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते.१९८६पर्यंत म्हणजे खारलॅन्ड खात्याची निर्मिती झाल्यापासून पहिल्या २० वर्षांत ही प्रक्रिया विनाखंड सुरू होती. मात्र, त्यानंतर रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले.मुंबईतील कारखानदारांनी रायगड जिल्ह्यात स्थलांतरित व्हावे, याकरिता राज्य सरकारने त्यांना विशेष योजनांचा देखील लाभ दिला. त्याकरिता रसायनी, तळोजा, पनवेल, रोहा,महाड अशी एकामागून एक औद्योगिक क्षेत्रे एमआयडीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली.त्याकरिता जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात सरकारी भूमी संपादन झाले. औद्योगिक कारख्यान्यांत नोकºया मिळणार या अपेक्षेने शेतकºयांनी सरकारी दराने आपल्या शेतजमिनी सरकारलादिल्या.बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता एकही अंदाजपत्रक नाही१९८६ नंतर सरकारच्या खारलॅन्ड खात्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील एकाही समुद्र संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही वा डागडुजी केली नाही. गेल्या ३० वर्षांत बंधाºयांची दुरुस्ती वा नवा बंधारा बांधणे या करिता एकही खर्च अंदाजपत्रक तयार करुन खारलॅन्ड विभागाने निधी मंजुरीकरिता सरकारकडे पाठविले नाही. परिणामी, एक रुपयाच्या निधीचीही तरतूद अर्थसंकल्पात झाली नसल्याचे राजन भगत यांनी शासनाकडूनच उपलब्ध कागदपत्रातून दाखवून दिले आहे.सांख्यिकी नोंदीअभावी नियोजन विभागाकडून आर्थिक तरतूद नाहीसमुद्र संरक्षक बंधारे फुटून नापीक झालेल्या आणि सद्यस्थितीत तेथे भात शेती पिकतच नसलेल्या जमिनींच्या सात-बारा उताºयांवर ‘नापीक शेतजमिनी’ अशा नोंदी करणे आवश्यक आहे, असे असताना ३० वर्षांत महसूल विभागाने एकही नोंद केलेली नाही.परिणामी, राज्य शासनाच्या सांख्यिकी नोंदीमध्ये रायगड जिल्ह्यातील भातशेती क्षेत्र कमी होऊन नापीक खारभूमी क्षेत्र वाढले आहे, असा निष्कर्ष प्राप्त झालेला नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नापीक खारभूमी क्षेत्र २४ हजार हेक्टर झाले असल्याचे भगत यांनी सांगितले.बुधवारी भूमी संपादन विभागाचे उप जिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांच्या समवेत झालेल्या श्रमिक मुक्तिदलाच्या शेतकरी बैठकीत भगत यांनी ही परिस्थिती लक्षात आणून दिली.नापीक जमिनी विकण्याची मानसिकता करण्याकरिता खासगी कंपन्यांचे ‘एजंट’नापीक भातशेती जमिनीत काहीही पिकत नसल्याने, बाजारभावाच्या तुलनेत कवडीमोल किमतीने खासगी भांडवलदार आणि उद्योगांना विकण्याचा पर्याय शेतकºयांनी अपरिहार्यतेने स्वीकारला आहे.नापीक जमिनी विकण्याकरिता शेतकºयांना राजी करण्याकरिता खासगी कंपन्यांचे ‘एजंट’ मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. ही सारी परिस्थिती पाहता भातशेती नापीक करुन ती कवडीमोल दराने विक्री करण्यासाठी शेतकºयांना भाग पाडले जात आहे.कोकणात समुद्र संरक्षक बंधाºयांची खारलॅन्ड योजना पूर्वी प्रभावीपणे अमलात आणली होती. त्याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद होत असे. मात्र, आता सरकारच्या अनास्थेमुळे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड