शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कामगारांची १५० कुटुंबे वाऱ्यावर

By admin | Updated: November 30, 2015 02:26 IST

नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागनवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यांची सरकार दरबारी सातबारा उताऱ्यावर नोंदच घेतली गेली नाही. त्यामुळे तेथील सुमारे १५० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. हक्कासाठी संघटित होऊन त्यांनी आता वज्रमूठ आवळली आहे. पनवेल तालुक्यातील सिध्दार्थ नगर, गणेशपुरी उलवे येथे गेल्या तीस वर्षांपासून राहणाऱ्या बहुजन समाजातील भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातबारा उताऱ्यावर तत्काळ नोंदी कराव्यात, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी आणि सिध्दार्थ नगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. भूमिहीन मजुरांना न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिला आहे. १९७० मध्ये सिडकोने जमिनीच्या संपादनाचे काम सुरू केले. त्यावेळी अनेकदा महसुली दप्तरी नोंदी घेण्याचे काम प्रशासनाकडून झाले नाही. तेथील घरे, बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली. आता जी कुटुंबे मुख्य गावठाण अथवा सातबारा नोंदी असलेल्या मालकी क्षेत्रामध्ये राहतात, त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दगडखाण, बिगारी, इमारतीच्या बांधकामाचे मजूर, अशी कामे करणाऱ्या सुमारे १५० स्थलांतरित कुटुंबांच्या नोंदी घेण्याचे काम महसूल प्रशासनाला जमलेले नसल्याची माहिती राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून सातबारा नोंदी होण्याची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या ३० वर्षांपासून येथे राहणाऱ्या काही कुटुंबांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आहे मात्र राहत्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि वीज नाही. आरोग्याच्या सुविधांची वानवा तेथे आहे. नवी मुंबई शहरासाठी दगडखाणीत काम करणारे हे खरे या शहराचे निर्माते आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देऊन त्यांच्या व्यवसायाचे होणारे नुकसान भरुन द्यावे, त्यांना प्रकल्पात सामावून घ्यावे आणि त्यांना साडेबावीस टक्के भूखंड द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.