शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची १५० कुटुंबे वाऱ्यावर

By admin | Updated: November 30, 2015 02:26 IST

नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे.

आविष्कार देसाई, अलिबागनवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील दगडखाण कामगारांचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्यांची सरकार दरबारी सातबारा उताऱ्यावर नोंदच घेतली गेली नाही. त्यामुळे तेथील सुमारे १५० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. हक्कासाठी संघटित होऊन त्यांनी आता वज्रमूठ आवळली आहे. पनवेल तालुक्यातील सिध्दार्थ नगर, गणेशपुरी उलवे येथे गेल्या तीस वर्षांपासून राहणाऱ्या बहुजन समाजातील भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातबारा उताऱ्यावर तत्काळ नोंदी कराव्यात, अशी मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी आणि सिध्दार्थ नगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. भूमिहीन मजुरांना न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिला आहे. १९७० मध्ये सिडकोने जमिनीच्या संपादनाचे काम सुरू केले. त्यावेळी अनेकदा महसुली दप्तरी नोंदी घेण्याचे काम प्रशासनाकडून झाले नाही. तेथील घरे, बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली. आता जी कुटुंबे मुख्य गावठाण अथवा सातबारा नोंदी असलेल्या मालकी क्षेत्रामध्ये राहतात, त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दगडखाण, बिगारी, इमारतीच्या बांधकामाचे मजूर, अशी कामे करणाऱ्या सुमारे १५० स्थलांतरित कुटुंबांच्या नोंदी घेण्याचे काम महसूल प्रशासनाला जमलेले नसल्याची माहिती राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून सातबारा नोंदी होण्याची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या ३० वर्षांपासून येथे राहणाऱ्या काही कुटुंबांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आहे मात्र राहत्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि वीज नाही. आरोग्याच्या सुविधांची वानवा तेथे आहे. नवी मुंबई शहरासाठी दगडखाणीत काम करणारे हे खरे या शहराचे निर्माते आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देऊन त्यांच्या व्यवसायाचे होणारे नुकसान भरुन द्यावे, त्यांना प्रकल्पात सामावून घ्यावे आणि त्यांना साडेबावीस टक्के भूखंड द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.