शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

छाननीत १२ अर्ज ठरले अवैध; कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:30 IST

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. छाननीत १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.१६ आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार १९ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होती, यामध्ये १३ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. २१ आॅगस्टपर्यंत पत्रे मागे घेण्याची तारीख आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. सोमवारी छाननीमध्ये १३ ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ६ प्रभागातील १७ जागांसाठी १०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती, त्यामध्ये ९८ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ३ अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.उमरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ५ प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यामध्ये ४७ वैध ठरली आहेत; तर ३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ४ प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. ३० वैध ठरली आहेत तर १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी दिली.जामरुंगमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ९ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, १६ वैध ठरली आहेत; तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.रजपे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती ती सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ७ जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यापैकी २४ वैध ठरली आहेत तर १ अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.- सध्या ५ सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत तर ५ ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. १९ आॅगस्ट रोजी झालेल्या छाननीमध्ये सदस्यांमधील २१५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले आहेत तर १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरले आहेत. २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.