शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

छाननीत १२ अर्ज ठरले अवैध; कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:30 IST

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. छाननीत १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.१६ आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार १९ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होती, यामध्ये १३ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. २१ आॅगस्टपर्यंत पत्रे मागे घेण्याची तारीख आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. सोमवारी छाननीमध्ये १३ ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ६ प्रभागातील १७ जागांसाठी १०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती, त्यामध्ये ९८ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ३ अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.उमरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ५ प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यामध्ये ४७ वैध ठरली आहेत; तर ३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ४ प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. ३० वैध ठरली आहेत तर १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी दिली.जामरुंगमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ९ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, १६ वैध ठरली आहेत; तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.रजपे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती ती सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ७ जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यापैकी २४ वैध ठरली आहेत तर १ अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.- सध्या ५ सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत तर ५ ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. १९ आॅगस्ट रोजी झालेल्या छाननीमध्ये सदस्यांमधील २१५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले आहेत तर १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरले आहेत. २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.