शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
3
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
4
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
5
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
6
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
7
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
8
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
9
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
10
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
11
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
12
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
13
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
14
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
15
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
16
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
17
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
18
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
19
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
20
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

छाननीत १२ अर्ज ठरले अवैध; कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:30 IST

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

कर्जत : तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी होणार आहेत. छाननीत १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.१६ आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार १९ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होती, यामध्ये १३ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. २१ आॅगस्टपर्यंत पत्रे मागे घेण्याची तारीख आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. सोमवारी छाननीमध्ये १३ ही नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ६ प्रभागातील १७ जागांसाठी १०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती, त्यामध्ये ९८ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ३ अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. चव्हाण यांनी दिली.उमरोली ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ५ प्रभागातील १३ जागांसाठी ५० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यामध्ये ४७ वैध ठरली आहेत; तर ३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. जाधव यांनी दिली.वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत तर ४ प्रभागातील ११ जागांसाठी ३१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. ३० वैध ठरली आहेत तर १ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेशकुमार घारपुरे यांनी दिली.जामरुंगमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ९ जागांसाठी २० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती, १६ वैध ठरली आहेत; तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.रजपे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी ६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती ती सर्व वैध ठरली आहेत तर ३ प्रभागातील ७ जागांसाठी २५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती त्यापैकी २४ वैध ठरली आहेत तर १ अवैध ठरले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.- सध्या ५ सरपंचपदाच्या जागेसाठी ३५ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत तर ५ ग्रामपंचायतीमधील एकूण ५७ सदस्यांसाठी २२७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. १९ आॅगस्ट रोजी झालेल्या छाननीमध्ये सदस्यांमधील २१५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले आहेत तर १२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरले आहेत. २१ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे.