शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द, चिकाटी, सरावामुळे यश

By admin | Updated: September 2, 2016 05:59 IST

मैदानी खेळांमध्ये सरावातील सातत्य, आहार, व्यायाम, जिद्द आणि चिकाटी हेच रिओ आॅलिम्पिकमधील स्टेपलचेस स्पर्धेच्या अंतिम फे रीतील यश आहे, असे मत भारताची धावपटू ललिता

पिंपरी : मैदानी खेळांमध्ये सरावातील सातत्य, आहार, व्यायाम, जिद्द आणि चिकाटी हेच रिओ आॅलिम्पिकमधील स्टेपलचेस स्पर्धेच्या अंतिम फे रीतील यश आहे, असे मत भारताची धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केले़ नॉव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित चिंचवड येथील विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या़ या वेळी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, अनुराधा देशमुख, जेऊरकर उपस्थित होते़ या वेळी बोलताना ललिताने आपण वयाच्या १३व्या वर्षी धावण्याच्या सरावास सुरुवात केली़ अनेक लढतींत विजय प्राप्त केला़ घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मला माझे ध्येय गाठायचे होते आणि आज ते मी मिळविले आहे़ परंतु, देशासाठी पदक जिंकता आले नाही, ही खंत आहे़ टोकिओ २०२०च्या आॅलिम्पिक स्पर्धेत देशासाठी नक्की पदक आणेन, असा विश्वास तिने व्यक्त केला़ या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ललिताने मी रोज पहाटे साडेतीन वाजता उठते़ साडेचार वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत धावण्याचा सराव करते़ आयुष्यात यशाला शॉर्टकट नसतो त्यासाठी प्रचंड कष्ट, ध्येय, कुटुंबाचा आधार, प्रशिक्षकाची शिकवण, गुरूंचा आशीर्वाद यांची गरज असते़, अशा टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या. खेळाडूंचा आहार त्यांच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा असतो़ देशाचे प्रतिनिधित्व करताना अर्जुन पुरस्काराची घोषणा होताच अधिक आनंद झाल्याचे तिने सांगितले़ उसेन बोल्ट आपला आदर्श खेळाडू असून, आई-वडील प्रेरणास्थानी आहेत, असे सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैदानी खेळाचा सराव करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. दोन वर्षांपासून कुटुंब सहवास टाळला होता़, असे ललिता बाबर यांनी सांगितले. इंटरनेटच्या जमान्यात विद्यार्र्थ्यांनी मैदानावर अधिक वेळ घालवावा, असा सल्ला तिने दिला़ (प्रतिनिधी)