शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

तरुणांनी राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST

श्री गणेश कला क्रीडा मंच येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने पानिपतनंतरचा मराठ्यांचा २५० वा विजय दिन साजरा ...

श्री गणेश कला क्रीडा मंच येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने पानिपतनंतरचा मराठ्यांचा २५० वा विजय दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात त्या बोलत होते.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्रदीप रावत, तुकोजी होळकर यांचे वंशज भूषण होळकर, इतिहासतज्ज्ञ उदय कुलकर्णी, डॉ. अतुल बिनीवाले आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबरोबरच तुकोजी होळकर, महादजी शिंदे, माधवराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिंदे म्हणाल्या,

छत्रपती शिवाजी, संभाजी आणि राजाराम महाराजांनी मोगल साम्राज्याचा ढाचा नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पाया रचला. त्यानंतर मराठा साम्राज्यात बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर यांनी मोघल आणि इंग्रजांविरुद्धही लढा दिला. त्यामुळे भारताच्या सीमाही वाढल्या. मराठेशाहीचे कर्तृत्व प्रत्येक तरुणाने वाचायला, ऐकायला हवे. राष्ट्रनिर्माणमध्ये सहभागी व्हावे.

....................

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पाठोपाठ संभाजी महाराज नऊ वर्ष स्वराज्यासाठी लढले. तर राजाराम महाराजांनी ११ वर्षे संघर्ष केला.

या सर्वांचे कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर या मराठ्यांनी दिल्ली जिंकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. पानिपत युद्धानंतर १० वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्ली जिंकली. याचे स्मरण करून नव्या पिढीने देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. या उद्देशाने २५० वा दिल्ली विजय दिन साजरा केला जातो.

- पांडुरंग बलकवडे

.............

देशातील तरुण आधुनिकतेच्या माध्यमातून जगभरात कर्तृत्व गाजवत आहेत. अनेक प्रसिध्द कंपन्याचे सीईओ भारतीय आहेत. चीन आणि पाकिस्तानसारखे शत्रू भारत तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोर्नोग्राफीच्या जाळ्यात अडकवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भारताला लक्ष्य केले जात आहे. अशा वेळी तरुणांनी जागृत राहणे गरजेचे आहे. त्यांना तोंड देण्यासाठी सशस्त्र सेना नेहमीच सज्ज राहणार आहे.

भूषण गोखले