शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

येलवडीत घाणीचे साम्राज्यच प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ...

गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत, गटारी तुटलेल्या अवस्थेत आहेत मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायत डोळे असून दुर्लक्ष करत आहे. या गटारीच्या वाहत्या पाण्यावरून अनेक वाहने ये - जा करतात पादचारी नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. काही वेळेस चुकून जर कुणाच्या अंगावर हे घाण पाणी उडाल्यास मोठा वादविवाद निर्माण ठरलेलाच असतो.

काही ठिकाणी गटारीची नियमित साफसफाई होते , तर काही ठिकाणी एक ते दिड महिन्यांनी सफाई होते , त्यामुळे त्या परिसरात डासाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. आधिच कोरोना व्हायरसच्या भितीने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे , त्यात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे . यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे . आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासाचा नायनाट होईल अशी धुरळणी सह फवारणी करणे गरजेचे आह. सार्वजनिक शौच्छालय देखील साफसफाई करणे गरजेचे आहे मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे त्यांची स्वच्छता करावी अशी अपेक्षा येलवाडीतील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

--

२१ महाळुंगे