शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येलवडीत घाणीचे साम्राज्यच प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ...

गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून वाहत आहे. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत, गटारी तुटलेल्या अवस्थेत आहेत मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायत डोळे असून दुर्लक्ष करत आहे. या गटारीच्या वाहत्या पाण्यावरून अनेक वाहने ये - जा करतात पादचारी नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. काही वेळेस चुकून जर कुणाच्या अंगावर हे घाण पाणी उडाल्यास मोठा वादविवाद निर्माण ठरलेलाच असतो.

काही ठिकाणी गटारीची नियमित साफसफाई होते , तर काही ठिकाणी एक ते दिड महिन्यांनी सफाई होते , त्यामुळे त्या परिसरात डासाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. आधिच कोरोना व्हायरसच्या भितीने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे , त्यात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे . यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे . आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासाचा नायनाट होईल अशी धुरळणी सह फवारणी करणे गरजेचे आह. सार्वजनिक शौच्छालय देखील साफसफाई करणे गरजेचे आहे मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे त्यांची स्वच्छता करावी अशी अपेक्षा येलवाडीतील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

--

२१ महाळुंगे