शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) थकवल्याच्या कारणावरून यंदा ४६ कारखान्यांना गाळपाची परवानगी नाकारण्यात आली आहे. थकीत रकमा अदा केल्यानंतर, त्यांना गाळपाचा परवाना देण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सहकार विभागाचे सचिव अनुप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य सहकार बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील ४६ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ३०० कोटी रुपये थकवले आहे. ते अदा झाल्यानंतरच त्यांना गाळपाची परवानगी देण्यात येणार आहे. उसाची पळवापळवी होऊ नये यासाठी १५ ऑक्टोबरच्या आधी कोणी कारखाना सुरू केला तर त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. केंद्र सरकारच्या निकषांनुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या साखर आयुक्तांच्या समितीचा अहवालावर ऊस दर नियंत्रण मंडळाने त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.

सरकारच्या या निर्णयामुळे आता दसऱ्यानंतर लगेचच ऊसतोडणी कामगारांचे स्थलांतर होण्यास सुरुवात होईल. मागील गाळप हंगामाच्या आधी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांना कामगारांसाठी सॅनिटायझर, मास्क तसेच स्थानिक रुग्णालयात राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले होते. याही वेळी ती काळजी घेण्यात येईल असे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.