शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

वर्षाला चार हजार मद्यपींवर खटले

By admin | Updated: May 10, 2015 05:13 IST

वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे हे समजते; पण उमजत नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे

पुणे : वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे हे समजते; पण उमजत नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाकाठी सरासरी ४०० लोकांचा अपघाती मृत्यू होतोय तर वर्षाला जवळपास चार हजार मद्यपी वाहनचालकांना कोठडीची हवा खावी लागत आहे. अपघातांमध्ये दोषी वाहनचालकांना मात्र शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये तब्बल तेरा हजार मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. तर चालू वर्षात साडेबाराशे मद्यपी वाहनचालकांवर खटले भरण्यात आले आहेत. यासोबतच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या तीन हजार २२२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुकत्याच सहा स्पीडगन विकत घेतल्या आहेत. या स्पीडगनच्या माध्यमातून जानेवारीपासून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी ६०१ जणांवर कारवाई केली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढत चालली आहे तर शहराच्या विस्तारामध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे दूरदृष्टी ठेवून रस्त्यांचे नियोजन करण्यामध्ये महापालिका आणि शासकीय स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. मोठ्या रस्त्यांवरून वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन ही तर नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालत जावे लागते. यासोबतच वाहनचालकांनाही शिस्तीचे धडे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर, चळवळींचे उगमस्थान आणि आयटी पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली आहे.