शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

वर्षाला चार हजार मद्यपींवर खटले

By admin | Updated: May 10, 2015 05:13 IST

वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे हे समजते; पण उमजत नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे

पुणे : वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे हे समजते; पण उमजत नाही, अशीच स्थिती वाहनचालकांची झालेली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो याची कल्पना असतानाही वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाकाठी सरासरी ४०० लोकांचा अपघाती मृत्यू होतोय तर वर्षाला जवळपास चार हजार मद्यपी वाहनचालकांना कोठडीची हवा खावी लागत आहे. अपघातांमध्ये दोषी वाहनचालकांना मात्र शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये तब्बल तेरा हजार मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. तर चालू वर्षात साडेबाराशे मद्यपी वाहनचालकांवर खटले भरण्यात आले आहेत. यासोबतच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या तीन हजार २२२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुकत्याच सहा स्पीडगन विकत घेतल्या आहेत. या स्पीडगनच्या माध्यमातून जानेवारीपासून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी ६०१ जणांवर कारवाई केली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढत चालली आहे तर शहराच्या विस्तारामध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे दूरदृष्टी ठेवून रस्त्यांचे नियोजन करण्यामध्ये महापालिका आणि शासकीय स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. मोठ्या रस्त्यांवरून वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन ही तर नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालत जावे लागते. यासोबतच वाहनचालकांनाही शिस्तीचे धडे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर, चळवळींचे उगमस्थान आणि आयटी पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली आहे.