शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बिल न भरल्याने यवतची वीज, पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

यवत : १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबतचे ...

यवत : १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले असताना यवत ग्रामपंचायतीने वीज बील न भरल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे गावातील नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचे काम विद्यमान पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने केले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांनी केला आहे.

सदानंद दोरगे म्हणाले, यवत ग्रामपंचायतीकडे पथदिवे व नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची तब्बल १ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपयांची थकबाकी आहे. यामुळे शुक्रवारी महावितरणने ग्रामपंचायतीची २७ वीज जोडणी तोडली. यामुळे गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून लवकर वीज जोडणी पूर्ववत न केल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. गावातील सर्व रस्ते अंधारात असणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने सदर वीज बील भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करावा असे परिपत्रक काढले आहे. यवत ग्रामपंचायतीकडे या निधीत ९० लाख रुपयांपेक्षा जास्तीचा निधी शिल्लक आहे. तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बिल अदा न केल्याने वीज खंडित करण्यात आली असल्याने गावातील नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.

गावातील ग्रामपंचायत महसूल गोळा करताना, ग्रामपंचायतीच्या ८६ व्यापारी गाळ्यांचे भाडे वसूल करण्या ऐवजी त्यांना राजकीय आश्रय दिला जातो. व्यापारी गाळ्यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे भाडे ग्रामपंचायतीला येणे थकीत आहे. त्यांना भाडे बिल दिले जात नाही तर सर्वसामान्य नागरिक व चाकरमानी वर्गाला कोरोनाच्या काळात देखील वसुलीचा तगादा ग्रामपंचायत लावत असल्याचा आरोप यावेळी सदानंद दोरगे यांनी केला.

वित्त आयोगाच्या निधीतून बिल भरणे अशक्य

पथ दिवे व पाणी पुरवठा योजनांची वीज बिल भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढले असले तरी १५ व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार मंजूर विकास आराखड्यात बदल करायचा असल्यास पहिल्यांदा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करून नंतर ग्रामसभेची कार्योत्तर मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या मंजुरी शिवाय १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधी मधून बिल भरणे शक्य नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी दिली.

२६ यवत

यवत ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज जोडणी तोडण्यात आल्याने पाणी पुरवठा विहिरीवरील सर्व पंप बंद अवस्थेत होते.