शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

बिल न भरल्याने यवतची वीज, पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST

यवत : १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबतचे ...

यवत : १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले असताना यवत ग्रामपंचायतीने वीज बील न भरल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे गावातील नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचे काम विद्यमान पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने केले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांनी केला आहे.

सदानंद दोरगे म्हणाले, यवत ग्रामपंचायतीकडे पथदिवे व नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाची तब्बल १ कोटी ८१ लाख ६२ हजार रुपयांची थकबाकी आहे. यामुळे शुक्रवारी महावितरणने ग्रामपंचायतीची २७ वीज जोडणी तोडली. यामुळे गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून लवकर वीज जोडणी पूर्ववत न केल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. गावातील सर्व रस्ते अंधारात असणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने सदर वीज बील भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करावा असे परिपत्रक काढले आहे. यवत ग्रामपंचायतीकडे या निधीत ९० लाख रुपयांपेक्षा जास्तीचा निधी शिल्लक आहे. तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बिल अदा न केल्याने वीज खंडित करण्यात आली असल्याने गावातील नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.

गावातील ग्रामपंचायत महसूल गोळा करताना, ग्रामपंचायतीच्या ८६ व्यापारी गाळ्यांचे भाडे वसूल करण्या ऐवजी त्यांना राजकीय आश्रय दिला जातो. व्यापारी गाळ्यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे भाडे ग्रामपंचायतीला येणे थकीत आहे. त्यांना भाडे बिल दिले जात नाही तर सर्वसामान्य नागरिक व चाकरमानी वर्गाला कोरोनाच्या काळात देखील वसुलीचा तगादा ग्रामपंचायत लावत असल्याचा आरोप यावेळी सदानंद दोरगे यांनी केला.

वित्त आयोगाच्या निधीतून बिल भरणे अशक्य

पथ दिवे व पाणी पुरवठा योजनांची वीज बिल भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढले असले तरी १५ व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार मंजूर विकास आराखड्यात बदल करायचा असल्यास पहिल्यांदा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करून नंतर ग्रामसभेची कार्योत्तर मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या मंजुरी शिवाय १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधी मधून बिल भरणे शक्य नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी दिली.

२६ यवत

यवत ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे वीज जोडणी तोडण्यात आल्याने पाणी पुरवठा विहिरीवरील सर्व पंप बंद अवस्थेत होते.