शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

अण्वस्त्र शस्त्रांस्त्रांच्या विळख्यात जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:08 IST

कोरोना महामारीचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. अनेकांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अशा अवस्थेतही मोठ्या प्रमाणात प्रगत देशांसह ...

कोरोना महामारीचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. अनेकांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अशा अवस्थेतही मोठ्या प्रमाणात प्रगत देशांसह विकसनशील देशांनी आपली लष्करी क्षमता विकसित करण्यावर गेल्या दोन वर्षांत भर दिला आहे. कोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत होते. आता नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही चीनवर लक्ष साधत त्यांच्या गुप्तचर संस्थांना ९० दिवसांत याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापर युद्ध तर आहेच, तसेच दक्षिण चीन समुद्र आणि तैवान प्रश्नावरून सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यात गेल्या वर्षापासून चीनने भारताशी सीमावाद उकरून लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात सैन्य जमवले आहे. दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती आजही आहे. चीनने त्यांची अत्याधुनिक शस्त्रे सीमेवर तैनात केली आहे. भारतानेही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर सैन्यव्यवस्था मजबूत केली आहे. दोन्ही देशांत सध्या चर्चा सुरू असली, तरी तणाव निवळला नाही. दुसरीकडे आखाती देशात इस्राईल-पॅलेस्टाईनवरून संघर्ष सुरू आहे. इराणही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही चीनला लक्ष करण्यात आले. याला चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. रशियातील ब्लादमिर पुतीन यांचे विरोधक असलेले ॲलेक्सी नवेलनी आणि युक्रेन प्रश्नावरून अमेरिका आणि रशिया यांचा तणाव आहे. पुतीन आणि बायडेन यांची जिन्हेवा येथे बैठक झाली. यावर विस्तृत चर्चा झाली असली, तरी प्रत्येक मुद्यावर तोडगा निघाला असे आजही म्हणता येणार नाही. चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, अमेरीका आणि ऑस्ट्रेलिया यांनी क्वाड समूहाची स्थापना केली. यामुळेही तणावाचे वातावरण आहे. जगात असलेली शीतयुद्धासारखी परिस्थिती मोठ्या संघर्षाचे रूप धारण करू शकते. हा संघर्ष अण्वस्त्र वापरापर्यंत जाण्याचीही शक्यता असल्याने संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष हा आण्विक युद्धापर्यंत येऊन ठेपला होता. मात्र, आण्विक प्ररोधनामुळे (न्यूक्लिअर डिटरन्स) यामुळे दोघांनीही एकमेकांवर हल्ला करण्याचे टाळले. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर हा संघर्ष कमी झाला. मात्र, आज चीन आणि रशिया यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे. आज ईंटरनॅशनल कॅम्पेन टू ॲबॉलिश न्यूक्लिअर वेपन्स (आयसीएएन) ही संस्था अण्वस्त्र कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळाले नाही. पूर्वीच्या तुलनेत आज तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहे. यामुळे लष्करी तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात डागता येईल अशा शस्त्रांस्त्रांची निर्मिती झाली आहे. समुद्राखाली, समुद्र व अवकाश व जमीन आणि आकाश, अशा ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली जातील, असे तंत्रज्ञान भारतासह विकसित देशांनी विकसित केलेले आहे़ अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्राने आततायीपणा केला, तर त्याचा परिणाम सर्व मानवी समूहाला सोसावा लागणार आहे़ हिरोशिमा व नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्बचे परिणाम अजूनही तेथील नव्या पिढीला सोसावे लागत आहेत़ त्यामुळे या विषयावर जागतिक समूहाने सुरक्षेच्या चौकटीत विचार करणे आज गरजेचे आहे.