शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

पालखी सोहळ्याचे व्हावे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

By admin | Updated: June 19, 2017 05:14 IST

गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे.

लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्यावर आम्ही भर दिला असून, ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये वारीची नोंद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अभिषेक मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.पालखी सोहळा प्रमुख अभिषेक मोरे आणि श्रीक्षेत्र देहू संस्थानचे प्रमुख बाळासाहेब मोरे यांच्याशी ‘लोकमत’ने पालखी सोहळ्यादरम्यान संवाद साधला. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. खरेतर भक्तिमार्गावर तरुण येत आहेत, हे सुचिन्ह आहे. मागील पाच वर्षांपासून मी या सोहळ्यात सेवा बजावतो आहे. सोहळाप्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही तरुणांना आणि उच्चशिक्षितांना वारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा देशासह संपूर्ण जगामध्ये आम्ही पोहोचवित आहोत. वारीमध्ये सहभागी होणारा तरुणवर्ग आमच्याकडे कोणत्या आशेने पाहतोय याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांच्या अशा कशाप्रकारे पूर्ण करू शकू याचा गांभिर्याने विचार करतो आहोत. त्यांचा सहभाग कशा प्रकारे वाढेल याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरुण मुले जर वारीमध्ये सहभागी झाली, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती आपोआप होणार आहे. संत साहित्याचा अभ्यास केला तर त्यांची पाऊले गैरमार्गाकडे वळणार नाहीत. त्यांना वारकरी संप्रदायाचे सांप्रदायिक वळण लागेल. कुटुंबातील लोकांना भक्तिमार्गाची जाणीव होईल. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. यंदाच्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यामध्ये ३३१ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोहळ्याचे हे ३३२ वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झाले आहेत. पाऊस आणि पेरण्या नसल्याने यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या कमी आहे. या पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी सहभागी होत असतात. मराठवाडा, विदर्भातील वारकरीही सहभागी होतात. अनेक दिंडीप्रमुखांनी पाऊस आणि पेरण्या नसल्यामुळे अडचण असल्याचे कळविले आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, लवकर पाऊस पडावा आणि पेरण्या उरकून शेतकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावी, अशी पांडुरंगाला विनंती करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले.