शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्याचे व्हावे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

By admin | Updated: June 19, 2017 05:14 IST

गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे.

लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्यावर आम्ही भर दिला असून, ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये वारीची नोंद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अभिषेक मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.पालखी सोहळा प्रमुख अभिषेक मोरे आणि श्रीक्षेत्र देहू संस्थानचे प्रमुख बाळासाहेब मोरे यांच्याशी ‘लोकमत’ने पालखी सोहळ्यादरम्यान संवाद साधला. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. खरेतर भक्तिमार्गावर तरुण येत आहेत, हे सुचिन्ह आहे. मागील पाच वर्षांपासून मी या सोहळ्यात सेवा बजावतो आहे. सोहळाप्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही तरुणांना आणि उच्चशिक्षितांना वारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा देशासह संपूर्ण जगामध्ये आम्ही पोहोचवित आहोत. वारीमध्ये सहभागी होणारा तरुणवर्ग आमच्याकडे कोणत्या आशेने पाहतोय याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांच्या अशा कशाप्रकारे पूर्ण करू शकू याचा गांभिर्याने विचार करतो आहोत. त्यांचा सहभाग कशा प्रकारे वाढेल याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरुण मुले जर वारीमध्ये सहभागी झाली, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती आपोआप होणार आहे. संत साहित्याचा अभ्यास केला तर त्यांची पाऊले गैरमार्गाकडे वळणार नाहीत. त्यांना वारकरी संप्रदायाचे सांप्रदायिक वळण लागेल. कुटुंबातील लोकांना भक्तिमार्गाची जाणीव होईल. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. यंदाच्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यामध्ये ३३१ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोहळ्याचे हे ३३२ वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झाले आहेत. पाऊस आणि पेरण्या नसल्याने यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या कमी आहे. या पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी सहभागी होत असतात. मराठवाडा, विदर्भातील वारकरीही सहभागी होतात. अनेक दिंडीप्रमुखांनी पाऊस आणि पेरण्या नसल्यामुळे अडचण असल्याचे कळविले आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, लवकर पाऊस पडावा आणि पेरण्या उरकून शेतकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावी, अशी पांडुरंगाला विनंती करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले.