शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पालखी सोहळ्याचे व्हावे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

By admin | Updated: June 19, 2017 05:14 IST

गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे.

लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्यावर आम्ही भर दिला असून, ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये वारीची नोंद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अभिषेक मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.पालखी सोहळा प्रमुख अभिषेक मोरे आणि श्रीक्षेत्र देहू संस्थानचे प्रमुख बाळासाहेब मोरे यांच्याशी ‘लोकमत’ने पालखी सोहळ्यादरम्यान संवाद साधला. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. खरेतर भक्तिमार्गावर तरुण येत आहेत, हे सुचिन्ह आहे. मागील पाच वर्षांपासून मी या सोहळ्यात सेवा बजावतो आहे. सोहळाप्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही तरुणांना आणि उच्चशिक्षितांना वारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा देशासह संपूर्ण जगामध्ये आम्ही पोहोचवित आहोत. वारीमध्ये सहभागी होणारा तरुणवर्ग आमच्याकडे कोणत्या आशेने पाहतोय याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांच्या अशा कशाप्रकारे पूर्ण करू शकू याचा गांभिर्याने विचार करतो आहोत. त्यांचा सहभाग कशा प्रकारे वाढेल याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरुण मुले जर वारीमध्ये सहभागी झाली, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती आपोआप होणार आहे. संत साहित्याचा अभ्यास केला तर त्यांची पाऊले गैरमार्गाकडे वळणार नाहीत. त्यांना वारकरी संप्रदायाचे सांप्रदायिक वळण लागेल. कुटुंबातील लोकांना भक्तिमार्गाची जाणीव होईल. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. यंदाच्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यामध्ये ३३१ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोहळ्याचे हे ३३२ वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झाले आहेत. पाऊस आणि पेरण्या नसल्याने यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या कमी आहे. या पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी सहभागी होत असतात. मराठवाडा, विदर्भातील वारकरीही सहभागी होतात. अनेक दिंडीप्रमुखांनी पाऊस आणि पेरण्या नसल्यामुळे अडचण असल्याचे कळविले आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, लवकर पाऊस पडावा आणि पेरण्या उरकून शेतकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावी, अशी पांडुरंगाला विनंती करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले.