शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भोर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर भोर नगरपलिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

भोरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी शहराध्यक्ष नितीन धारणे, सुहित जाधव, हसिना शेख, कुणाल धुमाळ, किरण आंबिके, विराज नलावडे, मयुर भिसे धिरज चव्हाण, राजेंद्र शिंदे, भिलारे, चेतन जाधव, मुन्ना बागवान दनिश शेख, मयुर भालेराव उपस्थित होते.

भोर शहराला भोर नगरपलिकेकडून मागिल ११ महिन्यांपासून दिवसाआड तर काही भागात कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. ही गोष्ट गंभीर आणि धोकादायक आहे. यात सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, शहराला दिवसाआड म्हणजे सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. तरीही पाणीपट्टी एक वर्षाची घेतली जाते. त्यामुळे एकतर पाणीपुरवठा नियमितपणे करावा, अन्यथा सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली. भोर शहराला स्वच्छ आणि नियमितपणे पाणीपुरवठा केला नाही तर पुढील आठ दिवसांत भोर नगरपलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे.

चौकट

भोर शहराला दररोज ३५ लाख लिटर पाणी लागते. नगरपालिकेकडे २ एमएलडी आणि दीड एमएलडी असे ३.५ एमएलडी (द.श.ल.क्ष मि.लि) पाणी फिल्टर होते. दोन फिल्टर आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी फिल्टर होत नाही. तर भोर नगरपालिकेचे नवीन फिल्टरचे काम मागील वर्षभरापासून अपूर्ण आहेत. त्यामुळे शहराला लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात फिल्टर होत नाही. यामुळे मागील ११ महिन्यांपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर काही भागांत कमी दाबाने आणि काही भागांत दूषित पाणीपुरवठा होतो.

चौकट

शहरातील कित्येक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी भरून झाल्यावर नळाद्वारे पाणी रस्त्यावर व गटांमध्ये सोडले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पाणी वाया जात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. यामुळे भोर नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याकडे लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

चौकट

भोर शहराला सहा महिनेच पाणीपुरवठा, मग पाणीपट्टी वर्षाची का?

भोर नगरपलिकेकडून मागील ११ महिने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे वर्षात सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. शिवाय अनेक भागांत दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तरीही एक वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. नगरपालिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

भोर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र फिल्टरचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच भोरला दररोज शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल. शहरातील सर्व सर्व नळांना नगरपालिकेमार्फत तोट्या बसवल्या जातील व खाजगी नळकनेक्शनधारकांनी तोट्या बसून घेण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर मात्र नळाला तोट्या न बसवल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.

-डॉ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी. भोर नगरपालिका