शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

भोर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर: नगरपलिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम रखडल्याने मागील ११ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नगरपलिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर भोर नगरपलिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

भोरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी शहराध्यक्ष नितीन धारणे, सुहित जाधव, हसिना शेख, कुणाल धुमाळ, किरण आंबिके, विराज नलावडे, मयुर भिसे धिरज चव्हाण, राजेंद्र शिंदे, भिलारे, चेतन जाधव, मुन्ना बागवान दनिश शेख, मयुर भालेराव उपस्थित होते.

भोर शहराला भोर नगरपलिकेकडून मागिल ११ महिन्यांपासून दिवसाआड तर काही भागात कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. ही गोष्ट गंभीर आणि धोकादायक आहे. यात सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, शहराला दिवसाआड म्हणजे सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. तरीही पाणीपट्टी एक वर्षाची घेतली जाते. त्यामुळे एकतर पाणीपुरवठा नियमितपणे करावा, अन्यथा सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली. भोर शहराला स्वच्छ आणि नियमितपणे पाणीपुरवठा केला नाही तर पुढील आठ दिवसांत भोर नगरपलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे.

चौकट

भोर शहराला दररोज ३५ लाख लिटर पाणी लागते. नगरपालिकेकडे २ एमएलडी आणि दीड एमएलडी असे ३.५ एमएलडी (द.श.ल.क्ष मि.लि) पाणी फिल्टर होते. दोन फिल्टर आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी फिल्टर होत नाही. तर भोर नगरपालिकेचे नवीन फिल्टरचे काम मागील वर्षभरापासून अपूर्ण आहेत. त्यामुळे शहराला लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात फिल्टर होत नाही. यामुळे मागील ११ महिन्यांपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर काही भागांत कमी दाबाने आणि काही भागांत दूषित पाणीपुरवठा होतो.

चौकट

शहरातील कित्येक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी भरून झाल्यावर नळाद्वारे पाणी रस्त्यावर व गटांमध्ये सोडले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पाणी वाया जात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. यामुळे भोर नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याकडे लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

चौकट

भोर शहराला सहा महिनेच पाणीपुरवठा, मग पाणीपट्टी वर्षाची का?

भोर नगरपलिकेकडून मागील ११ महिने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे वर्षात सहा महिनेच पाणीपुरवठा होतो. शिवाय अनेक भागांत दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तरीही एक वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. नगरपालिकेने नागरिकांकडून सहा महिन्यांचीच पाणीपट्टी घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

भोर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र फिल्टरचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच भोरला दररोज शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईल. शहरातील सर्व सर्व नळांना नगरपालिकेमार्फत तोट्या बसवल्या जातील व खाजगी नळकनेक्शनधारकांनी तोट्या बसून घेण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर मात्र नळाला तोट्या न बसवल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे.

-डॉ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी. भोर नगरपालिका