शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

अष्टविनायक महामार्गाचे तीन वर्षांपासून काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

केडगाव : गेल्या तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही अष्टविनायक मार्गावरील पारगाव ते दौंड येथील रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडेना. या ...

केडगाव : गेल्या तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही अष्टविनायक मार्गावरील पारगाव ते दौंड येथील रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडेना. या रस्त्यावर नांनगाव गाव येत असल्याने येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे.

आमदार राहुल कुल यांच्यामुळे अष्टविनायक महामार्गाच्या ८५० कोटी पैकी २५० कोटी निधी एकट्या दौंड तालुक्याला मिळाला आहे. कुल यांच्या प्रयत्नातून अष्टविनायक मार्गातून हा रस्ता मंजूर झाला आहे. ठेकेदाराचा नाकर्तेपणा व ग्रामस्थांची बेजबाबदार वृत्तीमुळे रस्ता अपूर्णावस्थेत आहे. सहा महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी मोठ्या शिताफीने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली, परंतु पारगाव नांनगाव परिसरातील काही ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम वेगवेगळी कारणे शोधत बंद पाडले. तेव्हापासून काम बंद आहे. ठेकेदाराने या रस्त्याचे रुंदीकरण केले असून त्यावर मुरूम पसरला आहे. धुरळा उधळू नये म्हणून दररोज टँकरने पाणी मारण्याचे काम चालू आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. हा रस्ता पारगाव, नानगाव, हातवळण, कानगाव, गार, नानविज सोनवडी मार्गे दौंडला जाणार आहे. अष्टविनायक महामार्गावरील सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या रस्त्यामुळे जोडले जाणार आहेत. पारगाव व नानगाव ग्रामस्थांना दौंडला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता प्राप्त होणार आहे. पारगाववरून ३० किलोमीटर अंतरावर दौंड असल्याने वेळ आणि पैसा यांची बचत होणार आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आमदार राहुल कुल यांनी या रस्त्यासाठी वीस कोटी निधी संबंधित ठेकेदाराकडे वर्ग केला. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नानगाव ग्रामपंचायतीने या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नगरारे यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला लवकरच काम सुरू केले जाईल असे आश्वासन दिले. पावसाळा तोंडावर आल्याने आम्हाला या रस्त्याची नितांत गरज आहे. तसेच संबंधित रस्ता अष्टविनायक महामार्गाकडे वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने आमची गैरसोय झाली आहे. असे नानगावचे उपसरपंच संदीप खळदकर-पाटील यांनी सांगितले.

रस्त्याचे काम चालू आहे. नुकतेच अष्टविनायक महामार्गपैकी पाटस दौंडचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा दौंड ते सिद्धटेक चालू आहे. हे काम संपल्यानंतर भविष्यामध्ये पारगाव ते दौंड हे काम हाती घेण्यात येणार आहे.

एस. डी. नगरारे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

०५ केडगाव नांनगाव

नानगाव येथे अष्टविनायक महामार्गाचे अर्धवट अवस्थेतील काम.