शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
2
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
3
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
4
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
5
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
6
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
7
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
8
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
9
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
10
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
11
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
12
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
13
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
14
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
15
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
16
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
17
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
18
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
19
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
20
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?

दुष्काळ हिरावणार ८० हजार जणांचे काम

By admin | Updated: September 3, 2015 03:13 IST

पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती

सुनील राऊत/महेंद्र कांबळे, बारामतीपाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती, जेजुरी तसेच कुरकुंभमधील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगाराचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचा पाणीसाठा कमालीचा घटल्याने ही परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिन्ही एमआयडीसींमध्ये सुमारे ५००हून अधिक लहानमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांना लागणारा कच्चा माल तसेच पूरक साहित्य उपलब्ध करून देणारे इतर लहानमोठे व्यवसायही बंद पडणार आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीने कष्टकऱ्यांच्या पोटाचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. बारामती एमआयडीसी थांबणार?बारामती एमआयडीसीला उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सुमारे ३०० हून अधिक लहानमोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या तसेच आवश्यक असलेले पूरक साहित्य पुरविणाऱ्या कंपन्यांत मिळून सुमारे ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपन्यांसाठी दरदिवशी १० ते १२ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. १९९० पासून म्हणजेच एमआयडीसी सुरू झाल्यापासून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यानंतर पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले, तरी पुरेसा न झालेला पाऊस यांमुळे पाच महिन्यांपासून पाच ते सहा तासच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आता उजनी धरणाची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने तसेच शासनाने उद्योगांचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हे पाणीही बंद झाल्यास या एमआयडीसीमधील उत्पादन २५ वर्षांत पहिल्यांदाच थांबेल. ...तर बाजारपेठाही होतील ठप्प पाण्याअभावी या कंपन्यांचे कामकाज बंद पडून या कामगारांचा रोजगार हिरावणार असून, त्याचा थेट परिणाम या परिसरात विकसित झालेल्या बाजारपेठांवर होईल. या महिन्यात गणेशोत्सव, तर पुढील दोन महिन्यांत दसरा-दिवाळी येत असल्याने ऐन सणासुदीच्या कालावधीत रोजगार हिरावला गेल्यास त्याचा या परिसरातील बाजारपेठांवर गंभीर परिणाम होणार असून, आर्थिक उलाढाल थंडावणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.जेजुरीला दोन दिवसांतून एकदाच पाणी जेजुरी एमआयडीसीला दडी मारलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण कोरडे पडले असल्याने तसेच या एमआयडीसीसाठी वीर धरणाच्या मांडकी डोहातून आणलेली पर्यायी पाण्याची व्यवस्थाही पावसाअभावी कोरडीठाक पडल्याने या एमआयडीसीला आधीच दोन दिवसांतून एकदा पाणी देण्यात येत आहे. या एमआयडीसीसाठी दरदिवशी ४ ते ५ एमएलडी पाण्याची गरज भासते. त्यातच आता शासनाचा निर्णय झाल्यास या ठिकाणचे उत्पादन पूर्णपणे थांबणार आहे. या एमआयडीसीमध्ये जवळपास ४ ते ५ हजार कामगारांना रोजगार मिळालेला आहे. यात प्रामुख्याने औषधनिर्माण तसेच काही स्टील कंपन्यांचा समावेश आहे. आधीच या ठिकाणी उत्पादनावर परिणाम होण्यास सुरुवात आहे.पुण्याच्या पाण्यावर कुरकुंभचे भवितव्यकुरकुंभ एमआयडीसीला खडकवासला धरणातून जाणाऱ्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये जेमतेम ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याच पाण्यावर पुणे शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने या धरणांतील सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्यास कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांचे उत्पादन ठप्प होईल. या एमआयडीसीला दरदिवशी सुमारे ७ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. या एमआयडीसीमध्ये जवळपास १५० कंपन्या असून, त्या ठिकाणी तब्बल १२ ते १३ हजार कामगार आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे भवितव्य पुण्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे.