शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

महिलेला चक्क स्कूटर मिळाली बदलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

विशाल शिर्के लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : साधी डाळ खराब निघाली तरी दुकानदार ती बदलून देताना खळखळ करतो. मग, ...

विशाल शिर्के

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : साधी डाळ खराब निघाली तरी दुकानदार ती बदलून देताना खळखळ करतो. मग, एखादी स्कूटरच खराब निघाली तर? ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या लढ्यामुळे अवघ्या चार ते पाच महिन्यांत महिलेला चक्क नादुरुस्त स्कूटरच्या बदल्यात नवी कोरी स्कूटर मिळाली. इतकेच नाही तर, घेतलेल्या स्कूटरच्या पुढील श्रेणीतील वाहन कोणताही नवा पैसा न भरता मिळाले.

औंधमधील डीपी रस्त्याजवळ राहणाऱ्या सुरेखा तापडिया यांनी चिकाटीने लढा देत आपला हक्क मिळविला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर म्हणाले, एखाद्या कंपनीने दिलेले उत्पादन खराब निघाल्यास ते बदलून घेण्याचा ग्राहकांना हक्क आहे. केवळ कॉलसेंटरला कळवून उपयोगाचे नाही. कंपनीशी लेखी अथवा ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करावा. रजिस्टर पत्राची एक प्रत आपल्याकडे ठेवावी. तसेच, पत्रव्यवहार करताना संबंधित अडचण ठराविक मुदतीत मार्गी काढण्याची मागणी करावी. तरच, त्याला काहीसा अर्थ राहील.

------------

डेक्कन येथील एका वितरकाकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. तीन महिने चालल्यानंतर गाडी वारंवार बिघडू लागली. काही वेळा दुरुस्ती केली. मात्र, वारंवार बॅटरीचा त्रास सुरू झाला. शेवटी संबंधित कंपनीला फोन केला. मात्र, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. आपण फसविले गेल्याची भावना निर्माण झाली. एका परिचिताने ग्राहक पंचायतीकडे तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार ग्राहक पंचायतीकडे तक्रार केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कंपनीकडे पत्रव्यवहार केला. कंपनी व्यवस्थापन, संबंधित वितरकाशी बोलणी केल्यानंतर चार ते पाच महिन्यांत कंपनीने त्यांची पुढील श्रेणीतील स्कूटर बदलून दिली.

- सुरेखा तापडिया, ग्राहक

---

वाहन खरेदी आणि देखभाल दुरुस्ती करताना घ्या काळजी

वाहन खरेदी करताना त्यातील बॅटरीची गॅरंटी-वॉरंटी (वस्तूचा हमी कालावधी), वाहनाची गॅरंटी आणि वॉरंटी पाहावी. बॅटरी आणि वाहन उत्पादनाची तारीख पाहावी. देखभाल दुरुस्तीला वाहन सोडल्यानंतर चांगली बॅटरी काढून घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती केल्यानंतर त्यावर बॅटरीचा क्रमांक नोंदविला की नाही, ते पाहावे. तसेच महत्त्वाचे सुटे भाग बदलले नसल्याची खात्री करावी, असे विजय सागर यांनी सांगितले.