शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

अवमान खपवून घेणार नाही

By admin | Updated: November 9, 2015 01:52 IST

मराठी साहित्य, संस्कृतीचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न राहणार असून, साहित्य परिषद, महामंडळाशी संवादाची भूमिका असणार आहे.

पुणे : मराठी साहित्य, संस्कृतीचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न राहणार असून, साहित्य परिषद, महामंडळाशी संवादाची भूमिका असणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही. संमेलनाच्या व्यासपीठावरील अध्यक्षांची खुर्ची बळकाविण्याचा प्रयत्न झाला तर लेचापेचा राहणार नाही, असा सज्जड इशारा ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य परिषद आणि महामंडळाला दिला.पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. सबनीस निवडून आल्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांचा परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते रविवारी सत्कार करण्यात आला. परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ८८व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. भालचंद्र शिंदे व्यासपीठावर होते.ते म्हणाले, की साहित्य संस्थांची एक परंपरा असते. कुठे चुकल्यास वाद-संघर्ष होतात. या जागा संवादाने घेतल्यास संघर्षाची वेळ येत नाही. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘साहित्यिकांची भूमिका राजकारण्यांपलीकडची असते. साहित्यिक प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे बघू शकतात. डॉ. शेजवलकर यांनी प्राचार्य सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा गौरव केला. सुरुवातीस महामंडळाचे उपाअध्यक्ष शिंदे यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन दीपक करंदीकर यांनी केले. आभार सुनील महाजन यांनी मानले. (प्रतिनिधी)