शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

पुण्याला पाणी देणार नाही!

By admin | Updated: October 16, 2015 01:17 IST

भामा आसखेड धरणामधून पुणे शहराला पाणी देण्याचा प्रश्न आज पुन्हा एकदा पेटला. मागण्या मान्य होईपर्यंत पाइपलाइनचे काम थांबवा

पाईट : भामा आसखेड धरणामधून पुणे शहराला पाणी देण्याचा प्रश्न आज पुन्हा एकदा पेटला. मागण्या मान्य होईपर्यंत पाइपलाइनचे काम थांबवा, अशी मागणी करूनही काम सुरूच राहिल्याने आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. करंजविहिरे गावच्या हद्दीत हे आंदोलन झाले असून, संतप्त आंदोलकांनी मशिनरीचीही तोडफोड केली. ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.या वेळी आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला जिल्हासंघटक विजयाताई शिंदे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्ह परिषद सदस्य किरण मांजरे यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना होत असलेल्या जलवाहिनेचे काम जोरदार सुरू आहे. आमदार सुरेश गोरे यांनी पुनर्वसन होत नाही, आळंदी शहरास पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, पुरवठा व लाभक्षेत्रातील गावांच्या जमिनीवरील शिक्के काढत नाही, तोपर्यंत जलवाहिनीचे काम थांबविण्याची मागणी केली होती; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज शिवसैनिक आक्रमक झाले.करंजविहिरे गावच्या हद्दीमध्ये आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यानंतर मशिनरीच्या काचा फोडत घोषणा दिल्या. यापुढे एक इंचही काम झाल्यास आंदोलन उग्र स्वरूपात केले जाईल, असा इशारा दिला. (वार्ताहर)