शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी एकरकमी की तीन हप्त्यात मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या कायद्याप्रमाणे कारखान्याला ही किंमत एकाच वेळी द्यायला लागते. ऊस दिल्यावर शेतकऱ्यांना लगेच हातात पैसे मिळतात. पण कारखानदारांना यामध्ये अडचण येत आहे.

साखर कारखान्यांना साखर विक्री अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या एफआरपी एकरकमी देणे शक्य होत नाही. एकाएका कारखान्याला २०० ते ४०० कोटी रुपयांपर्यंत एफआरपी प्रत्येक हंगामात द्यावी लागते. कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने कारखाने एफआरपी देण्यासाठी कर्ज काढतात. त्यावरचे व्याज देऊन मेटाकुटीला येतात व अपेक्षित साखर विक्री झाली नाही तर अंतिमत: आर्थिक अडचणीत येऊन आजारी होत बंद पडतात.

यावर काय करता येईल, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांचे मत मागवले होते. त्याचा अभ्यास करून निती आयोगाला अहवाल तयार करण्यास सांगितले. देशातील बहुतांश राज्य सरकारांमध्ये कारखानदारांचे प्राबल्य असल्याने त्यांनी एफआरपी तीन हप्त्यात द्यावी, असे सुचवले आहे. निती आयोगाने कारखान्यांच्या सूचनांचा विचार करून केंद्र सरकारला एफआरपीचे तीन हप्ते करण्याची शिफारस केली आहे. तसे केले नाही तर आर्थिक अडचणीतून एखादा - दुसरा कारखाना नाही, तर साखर उद्योगच बंद पडण्याची भीतीही आयोगाने व्यक्त केली आहे.

--------------------

शेतकऱ्यांचा विचार नाही केला...

आता यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामातच निर्णय व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा यात काहीही विचार केला गेला नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर कोणत्याही स्थितीत एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही, असे जाहीर करत प्रसंगी कारखाने बंद पाडू, असा इशाराही दिला आहे.

---//