शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

एफआरपी एकरकमी की तीन हप्त्यात मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किंमत (एफआरपी) वेगवेगळ्या तीन हप्त्यांमध्ये देण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या कायद्याप्रमाणे कारखान्याला ही किंमत एकाच वेळी द्यायला लागते. ऊस दिल्यावर शेतकऱ्यांना लगेच हातात पैसे मिळतात. पण कारखानदारांना यामध्ये अडचण येत आहे.

साखर कारखान्यांना साखर विक्री अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या एफआरपी एकरकमी देणे शक्य होत नाही. एकाएका कारखान्याला २०० ते ४०० कोटी रुपयांपर्यंत एफआरपी प्रत्येक हंगामात द्यावी लागते. कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने कारखाने एफआरपी देण्यासाठी कर्ज काढतात. त्यावरचे व्याज देऊन मेटाकुटीला येतात व अपेक्षित साखर विक्री झाली नाही तर अंतिमत: आर्थिक अडचणीत येऊन आजारी होत बंद पडतात.

यावर काय करता येईल, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांचे मत मागवले होते. त्याचा अभ्यास करून निती आयोगाला अहवाल तयार करण्यास सांगितले. देशातील बहुतांश राज्य सरकारांमध्ये कारखानदारांचे प्राबल्य असल्याने त्यांनी एफआरपी तीन हप्त्यात द्यावी, असे सुचवले आहे. निती आयोगाने कारखान्यांच्या सूचनांचा विचार करून केंद्र सरकारला एफआरपीचे तीन हप्ते करण्याची शिफारस केली आहे. तसे केले नाही तर आर्थिक अडचणीतून एखादा - दुसरा कारखाना नाही, तर साखर उद्योगच बंद पडण्याची भीतीही आयोगाने व्यक्त केली आहे.

--------------------

शेतकऱ्यांचा विचार नाही केला...

आता यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामातच निर्णय व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचा यात काहीही विचार केला गेला नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर कोणत्याही स्थितीत एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही, असे जाहीर करत प्रसंगी कारखाने बंद पाडू, असा इशाराही दिला आहे.

---//