शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

इंद्रायणीतील दूषित पाण्याचा शेतीसाठी सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:10 IST

भानुदास पऱ्हाड आळंदी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील मैलामिश्रित तसेच औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रसायन घटक असलेले सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडून ...

भानुदास पऱ्हाड

आळंदी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील मैलामिश्रित तसेच औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रसायन घटक असलेले सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण केले जात आहे. याच प्रदूषित पाण्याचा वापर नदीकाठचे शेतकरी सर्रासपणे शेकडो एकर शेतसिंचनासाठी करत आहेत. या पाण्यापासून भाजीपाल्यासह इतर सर्वच पिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घेतले जात आहे. दूषित पाण्यापासून उत्पादित झालेली विविध पिके बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र ही सर्व पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहेत.

तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैलामिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील हानिकारक रासायनिक घटक असलेले दूषित पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. एकीकडे आळंदीसह आसपासची नदीकाठची असंख्य गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. नदीकाठचे तसेच पाईपलाईनचे लिप्ट असलेले अनेक शेतकरी विद्युत मोटारीच्या साह्याने हे पाणी आपल्या शेतात नेऊन विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत.

ज्यावेळी हे पाणी शेतातील पिकांना दिले जाते. त्यावेळी पाण्यातील सर्व हानिकारक घटक पिकांच्या मुळाद्वारे शोषले जातात. या पाण्यातून उत्पादित झालेला भाजीपाला तसेच धान्यात हे घटक स्थिर होतात. विशेष म्हणजे अशा पद्धतीचा भाजीपाला अथवा धान्य आरोग्यास अपायकारक ठरते. याच पाण्यावर उत्पादित केलेला चारा जनावरांना खाऊ घातल्यास त्यांनाही त्रास होतोच. मात्र चाऱ्यापासून तयार झालेले दूधदेखील मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू लागले आहे.

मैलामिश्रित तसेच हानिकारक रासायनिक घटक असलेले पाणी नदीपात्रात वाहून येत असल्याने पाण्याचे मोठे प्रदूषण झाले आहे. मात्र आळंदीकरांना हेच पाणी पिण्यासाठी तसेच वापरासाठी वापरावे लागत आहे. तर अनेक गावांच्या नळ - पाणी पुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहेत. परिणामी नागरिकांमध्ये आजार जडू लागले आहेत. अनेक नागरिक आर्थिक झळ सोसून पाण्याचा जार विकत घेत आहेत.

इंद्रायणी नदीपात्रातील दूषित पाणी मोटारीच्या साह्याने शेतीसाठी वापरले जाते. मात्र हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू पाहत आहे.