शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पक्षी विसाव्याचा ‘पिकनिक स्पॉट’ करणाऱ्यांना टोचणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

पुणे : चीन ते दक्षिण आफ्रिका असा लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणारे अमूर फाल्कन पक्षी विश्रांतीसाठी लोणावळ्यात विसावले आहेत. पक्ष्यांना ...

पुणे : चीन ते दक्षिण आफ्रिका असा लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणारे अमूर फाल्कन पक्षी विश्रांतीसाठी लोणावळ्यात विसावले आहेत. पक्ष्यांना पाहण्यासाठीच अतिउत्साही नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, आपली हौस भागवण्यासाठी पक्ष्यांच्या विश्रांतीमध्ये अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पक्षितज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. पक्ष्यांचा विसावा म्हणजे ‘पिकनिक स्पॉट’ नव्हे, ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

‘वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ अशी खासियत असलेला अमूर फाल्कन हजारो किलोमीटरचे अंतर पार करत लोणावळ्यात विसावला. नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहे. काहीशी विश्रांती घेऊन हा पक्षी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने पुन्हा झेपावेल किंवा एव्हाना झेपावला असेलही. मात्र तोवरच अमूर फाल्कनला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली.

पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता, छायाचित्रणाचा छंद यामुळे गर्दी होते. विविध माध्यमांमधून पक्षी आल्याचे लोकांना समजते. उत्सुकता, कुतूहल वाटणे आणि लांबून पक्ष्यांचे निरीक्षण करणे ठीक आहे. मात्र, आपल्या उपस्थितीचा त्यांना त्रास होऊ नये, यासाठी लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. विसाव्याच्या ठिकाणी गर्दी केल्यास इतर पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो, असे मत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.

“पक्ष्यांच्या निरीक्षणाप्रमाणेच त्यांचा अधिवास, सवयी, स्थलांतर याबाबतचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. इला फाऊंडेशनतर्फे दरवर्षी पक्षिशास्त्र अभ्यासक्रम शिकवला जातो. यंदा हा कोर्स ऑनलाईन घेतला. त्यात शंभरपेक्षा जास्त पक्षीप्रेमी सहभागी झाले आहेत. पक्ष्यांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे समाधान वाटते, असे डॉ. पांडे म्हणाले.

चौकट

विश्रांतीत व्यत्यय आणणे चूक

“थेट २ ते ४ हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करणारे अमूर फाल्कन विश्रांतीसाठी लोणावळ्यात उतरले. त्यांच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणू नये,” असे मत पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. डॉ. पांडे म्हणाले, ‘‘अमूर फाल्कन गेल्या १५ वर्षांपासून पुण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात येत आहेत. त्यामुळे ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास न थांबता करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीची गरज असते. त्यांच्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणणे चुकीचे आहे.”

-डॉ. सतीश पांडे, ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ