शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

नाठाळाच्या माथी मारणार कोण काठी?

By admin | Updated: July 3, 2016 04:01 IST

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी स्थायी समितीमध्ये खर्चाच्या आकड्यांमध्ये गोलमाल करीत घाईघाईत

पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी स्थायी समितीमध्ये खर्चाच्या आकड्यांमध्ये गोलमाल करीत घाईघाईत ऐनवेळचा विषय मंजूर करून घेतला. मात्र, पालखी सोहळा निम्म्या मार्गात पोहोचला असताना अद्यापही त्याचे कामही सुरू झाले नाही. पालखी सोहळ्याच्या कालावधीत अभंग दृकश्राव्य होणार नसतील, तर ऐनवेळी विषय मंजुरीची घाई कशाला केली, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. ऐनवेळच्या विषयाऐवजी या कामासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबविल्यास आणखी कमी खर्चात हे काम होऊ शकते. आषाढी वारीच्या कालावधीत तुकोबारायांची अभंगगाथा मोबाइलद्वारे तसेच डिजिटल मीडियाद्वारे ऐकावयास मिळावी, यासाठी अभंगगाथा दृकश्राव्य करण्यासाठीच्या विषयास १४ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाच्या खर्चाचे आकडे अक्षरी व अंकी यात तफावत होती. अभंग दृकश्राव्य करण्याच्या कामासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाखांचा विषय स्थायीने मंजूर करवून घेतला होता. हा गैरकारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीला हा चुकीचा ठराव रद्द करणे भाग पडले. यामुळे पाच लाख खर्चाचा प्रस्ताव दाखवून ५० लाख लाटण्याचा स्थायीचा डाव फसला. अखेर अभंग दृकश्राव्य करण्यासाठी येणाऱ्या पाच लाखांचा नवीन ठराव २१ जूनला करण्यात आला. प्रिंटिंग मिस्टिेक झाल्याचे सांगत नवीन ठराव केला. यामध्ये प्रती अभंग १११ रुपये खर्च दाखविण्यात आला असून, चार हजार ५८६ अभंगांसाठी पाच लाख नऊ हजार ४६० रुपये खर्च येत असल्याचे नमूद करून ठराव मंजूर केला. (प्रतिनिधी)दरम्यान, या कामाचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, अद्यापही कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शिवाय, कामाचे आदेश दिले, तरीही हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ऐनवेळचा विषय दाखल करण्याचा खटाटोप स्थायी समितीने कशासाठी केला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली असता निविदेत स्पर्धा होऊन आणखी कमी रकमेत काम झाले असते. मात्र, तसे न करता ऐनवेळचा विषय घुसडण्यात आला. अशा प्रकारे इतरही मोठे खर्चाचे विषय गुपचूपरीत्या मंजूर करून घेतले जात असून, यातून करदात्यांच्या पैशांची एक प्रकारे लूट केली जात असल्याचे स्पष्ट होते.