शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गेला कुठे पुणे तुंबल्याचा अहवाल?

By admin | Updated: November 27, 2015 01:49 IST

अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे.

पुणे : अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे. अग्निशामक विभागाने पाणी कुठे-कुठे साचले, याबाबत दिलेल्या अहवालाशिवाय हे पाणी का साचले, त्याला जबाबदार कोण, हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुण्याची दैना केली. विमानतळ परिसर तसेच कळस, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला. या परिसरातील नगरसेवक सतीश म्हस्के यांनी त्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवली. त्यांच्याबरोबरच अनिल टिंगरे, वर्षा तापकीर, वसंत मोरे, योगेश मुळीक, अस्मिता शिंदे आदींनीही प्रशासनाला धारेवर धरले. म्हस्के यांनी तर नागरिकांच्या नुकसानाला अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणारी पालिकाच जबाबदार असून, घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी केली.नव्याने बांधकाम करताना नाल्यांचे नैसर्गिक वळण अनेक बांधकाम व्यावसायिकांनी स्वत:च्या सोयीनुसार वळविले आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी साचून ते वस्त्यांमधील घरांत शिरले, असा आरोप करून म्हस्के यांनी काही जणांची नावेही सर्वसाधारण सभेत घेतली होती. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सभेनंतर त्यांनी लगेचच या परिसरात जाऊन पाहणीदेखील केली़ अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगून त्वरित अहवाल देण्यास सांगितले होते़ मात्र, पाऊस संपून आता तीन दिवस झाले तरीही ही चौकशी काही झालेली दिसत नाही. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे अग्निशामक विभागाने कुठे-कुठे पाणी साचले, याचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी दिला. या एका अहवालाशिवाय पालिकेच्या कोणत्याही विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचे दिसत नाही. पाऊस संपला तसेच आयुक्तांचे चौकशीनंतर दोषींवर कारवाईचे आश्वासनही वाऱ्यावरच विरले आहे. घरात पाणी शिरून अन्नधान्याचे नुकसान झालेले नागरिक मात्र आता रेशनिंग कसे भरायचे, या चिंतेत आहेत.पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने दैना केली.विमानतळ परिसर, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला.