शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गेला कुठे पुणे तुंबल्याचा अहवाल?

By admin | Updated: November 27, 2015 01:49 IST

अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे.

पुणे : अवकाळी पावसाने शहराची तब्बल दोन दिवस दुर्दशा केली़ त्यावर अनेक नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले़ आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले़ मात्र, ही चौकशी व अहवालही पावसाबरोबरच गायब झाला आहे. अग्निशामक विभागाने पाणी कुठे-कुठे साचले, याबाबत दिलेल्या अहवालाशिवाय हे पाणी का साचले, त्याला जबाबदार कोण, हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने पुण्याची दैना केली. विमानतळ परिसर तसेच कळस, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला. या परिसरातील नगरसेवक सतीश म्हस्के यांनी त्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवली. त्यांच्याबरोबरच अनिल टिंगरे, वर्षा तापकीर, वसंत मोरे, योगेश मुळीक, अस्मिता शिंदे आदींनीही प्रशासनाला धारेवर धरले. म्हस्के यांनी तर नागरिकांच्या नुकसानाला अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणारी पालिकाच जबाबदार असून, घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी केली.नव्याने बांधकाम करताना नाल्यांचे नैसर्गिक वळण अनेक बांधकाम व्यावसायिकांनी स्वत:च्या सोयीनुसार वळविले आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी साचून ते वस्त्यांमधील घरांत शिरले, असा आरोप करून म्हस्के यांनी काही जणांची नावेही सर्वसाधारण सभेत घेतली होती. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सभेनंतर त्यांनी लगेचच या परिसरात जाऊन पाहणीदेखील केली़ अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगून त्वरित अहवाल देण्यास सांगितले होते़ मात्र, पाऊस संपून आता तीन दिवस झाले तरीही ही चौकशी काही झालेली दिसत नाही. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे अग्निशामक विभागाने कुठे-कुठे पाणी साचले, याचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी दिला. या एका अहवालाशिवाय पालिकेच्या कोणत्याही विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचे दिसत नाही. पाऊस संपला तसेच आयुक्तांचे चौकशीनंतर दोषींवर कारवाईचे आश्वासनही वाऱ्यावरच विरले आहे. घरात पाणी शिरून अन्नधान्याचे नुकसान झालेले नागरिक मात्र आता रेशनिंग कसे भरायचे, या चिंतेत आहेत.पावसाच्या गायब होण्याबरोबरच आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आश्वासनही गायब झाले. सलग दोन दिवसांच्या मुसळधार अवकाळी पावसाने दैना केली.विमानतळ परिसर, विश्रांतवाडी, जयप्रकाशनगर वगैरे परिसरात तर पावसाच्या साचलेल्या पाण्याने धुमाकूळ घातला.