शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नववीचे ११ हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाहीत. त्याचप्रमाणे नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुध्दा परीक्षेची एक संधी दिले ...

शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाहीत. त्याचप्रमाणे नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुध्दा परीक्षेची एक संधी दिले जाते. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यातील नववीतील १ लाख ६५ हजार २७२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४९ हजार ८१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४ हजार ९९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ११ हजार विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशच घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नववीत उत्तीर्ण होऊनही दहावीचा परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ३६१ एवढी आहे.

-----------------------------

शाळांचा निकाल शंभर टक्के लागावा, या उद्देशाने काही शाळा विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करत असल्याचा घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पालकांनी यापूर्वी अनेक वेळा याबाबत शिक्षण विभाकडे तक्रार केली आहे. परंतु, काही शाळांनी शंभर टक्के निकालासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले आहे. त्यातच कोरोनामुळे शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. मग विद्यार्थी कमी का झाले? नववीतील पटसंख्या अधिक दाखवली गेली का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

----------------

“बालविवाह,आर्थिक चणचण किंवा स्थलांतर आदी कारणांमुळे नववीतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते,असे बोलले जात असले तरी कोरोनामुळे केवळ स्थलांतराच्या कारणामुळे ही विद्यार्थिसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. इतर कारणे असतील तर ती प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधून जाणून घ्यावी लागतील.”

-डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

-----------------------------

“स्थलांतराच्या कारणामुळे जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या कमी झाली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाकडून तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले. स्थलांतरामुळेच विद्यार्थी कमी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतला नसावा.”

-अपर्णा वाखारे, माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

--------------------------

इयत्ता नववीतील उत्तीर्ण विद्यार्थिसंख्या : १,४९,८१२

दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १,३८,१४२

-----------------------