शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलीस भरती कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:08 IST

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले ...

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

राज्यात पहिल्यांदाच १२ हजार ५२८ पदांची मोठी पोलीस भरती करणार, या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येणार नाही आदी घोषणा राज्य सरकारने केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

कोरोनाची साथ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आदिवासी पट्यातील, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे ध्येय ठेऊन अनेक युवक-युवती तयारी सुरू करतात.

मात्र राज्य शासनाच्या ढिलाईमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. यात हजारो तरुण-तरुणींची ऐन उमेदीची वर्षे वाया चालली आहेत. तीन वर्षे भरती झाली नसल्याने अनेकांची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागावा, राजकारणामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावते आहे या प्रश्नांंमध्ये विद्यार्थी गुरफटले आहेत. पोलीस भरती तीन वर्षे रखडल्याने आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत असल्याची खंत किरण गवळी, गणेश काशीद, संतोष खताळ, कौतुभ जगताप, कृष्णा काते, सचिन शिंदे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

चौकट

काय झाले गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचे?

“पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार. पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल,” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख मे २०२० मध्ये दिले होते.

चौकट

सरकार याची उत्तरे देईल का?

- परीक्षा कधी होणार?

- लेखी परीक्षा? आधी होणार की मैदान चाचणी परीक्षा?

- लेखी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?

- सरकारी दिरंगाईमुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार?

- ऑनलाईन परीक्षेत भ्रष्टाचार झाला तर जबाबदारी कोणाची ?