शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

राज्यात पोलीस भरती कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:08 IST

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले ...

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

राज्यात पहिल्यांदाच १२ हजार ५२८ पदांची मोठी पोलीस भरती करणार, या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येणार नाही आदी घोषणा राज्य सरकारने केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

कोरोनाची साथ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आदिवासी पट्यातील, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे ध्येय ठेऊन अनेक युवक-युवती तयारी सुरू करतात.

मात्र राज्य शासनाच्या ढिलाईमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. यात हजारो तरुण-तरुणींची ऐन उमेदीची वर्षे वाया चालली आहेत. तीन वर्षे भरती झाली नसल्याने अनेकांची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागावा, राजकारणामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावते आहे या प्रश्नांंमध्ये विद्यार्थी गुरफटले आहेत. पोलीस भरती तीन वर्षे रखडल्याने आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत असल्याची खंत किरण गवळी, गणेश काशीद, संतोष खताळ, कौतुभ जगताप, कृष्णा काते, सचिन शिंदे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

चौकट

काय झाले गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचे?

“पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार. पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल,” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख मे २०२० मध्ये दिले होते.

चौकट

सरकार याची उत्तरे देईल का?

- परीक्षा कधी होणार?

- लेखी परीक्षा? आधी होणार की मैदान चाचणी परीक्षा?

- लेखी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?

- सरकारी दिरंगाईमुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार?

- ऑनलाईन परीक्षेत भ्रष्टाचार झाला तर जबाबदारी कोणाची ?