शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाचे गणित जुळवताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

ग्रामपंचायत निवडणुक : सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने झाली गोची लोकमत न्यूज नेटवकर्क बारामती: राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली ...

ग्रामपंचायत निवडणुक : सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने झाली गोची

लोकमत न्यूज नेटवकर्क

बारामती: राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मात्र महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकासमोर ठाकणार आहेत. सरपंचपदाचे आरक्षण ऐनवेळी राज्यसरकारने रद्द केल्याने पॅनलप्रमुखांची मात्र गोची झाली आहे. पॅनेलच्या खर्चाचे गणित जुळवताना त्यांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ७४८ गावच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवारी (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने आणि अटीतटीने होतात. एका-एका मताची बेरीज जुळवत पॅनेल विजयी करण्याचे डावपेच पॅनेल प्रमुख आखत असतात. सरपंचपदासाठी ज्या प्रवर्गाचे आरक्षण पडते. त्या प्रवर्गातील उमेदवारास पॅनेलच्या प्रचाराचा खर्च उचलावा लागतो. असा आजपर्यंतचा अलिखित नियम आहे. मात्र राज्यसरकाने ऐनवेळी सरपंचपदाचे आरक्षण रद्द केल्याने गाव कारभारी आणि उमेदवार बुचकळ्यात पडले आहेत. सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे गुलदस्त्यात असल्याने प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचाराचा खर्च स्व:ताच उचलावा लागणार आहे. तर पॅनेल प्रमुखांना देखील उमेदवार निवड करताना प्रत्येक प्रवर्गाला समान न्याय द्यावा लागणार आहे. त्यामुळे उद्या निवडणुक जिंकली तर सरपंच पदाचे आरक्षण पडल्यावर सबंधीत प्रवर्गाचा उमेदवार आपल्याकडे असावा, यापद्धतीने नियोजन करण्यात सध्या पॅनेलप्रमुख व्यस्त आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गाव कारभारी होण्यासाठी मोठे मनसुबे ठेवणाऱ्या गाव पुढाऱ्यांना आनंद झाला. कारण गावागावात सरपंच पदावर डोळा ठेवून अनेकांनी मोचेर्बांधणी केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारच्या एका परिपत्रकांन पाणी फिरवलंय. गावागावात सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनल प्रमुखांकडून किंवा सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना, निवडणूक रिंगणात उतरवले जाते. स्वत:बरोबर या उमेदवाराचा खर्च सरपंचपदाचे आरक्षण असणाऱ्या उमेदवाराला उचलावा लागतो. यंदा, मात्र सरपंच कोण होणार हे गुलदस्त्यात आहे.

चौकट

सरपंचपदाची आरक्षणाची सोडत ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांची धाकधुक वाढली आहे. खर्च केला आणि आरक्षणात भलतंच आलं तर अशी भीती या पुढाऱ्यांसमोर आहे. यापूर्वी प्रत्येक वेळेस निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सगळी यंत्रणा राबविली जाते. उमेदवारांच्या उमेदवारी खचार्पासून ते प्रचारयंत्रणेपर्यंतचा खर्च उचलला जातो. मात्र यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला आहे.