शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक सिटीचं काय होणार? -महाळुंगेतील भागधारक शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

................. दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत महाळुंगे येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या ...

.................

दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत महाळुंगे येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून महत्त्वाकांक्षी हायटेक सिटी उभारण्याचा निर्णय घेतला होता. विलिनीकरणाच्या निर्णयामुळे आता त्या प्रकल्पाचे काय होणार, असा प्रश्न आता ग्रामस्थांना सतावत आहे.

गावातील विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीबरोबर पीएमआरडीएकडे आहे. पण गावात विकासकामांच्या बाबतीत पीएमआरडीचे सुरुवातीपासून दुर्लक्ष होत आहे. त्यांनी विकासकामे करताना गावकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे, मात्र तसे होत नसल्याने परस्परविरोधी योजना राबवल्या जात असल्याची तक्रार नागरिक करतात. पीएमआरडीएची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी डॉ. किरण गिते यांच्याकडे होती, तोपर्यंत सर्व माहिती गावकऱ्यांना मिळायची, पण आता त्यांची बदली झाल्यानंतर गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यात प्रशासन दोषी आहे, असे गावकरी सांगतात.

गावात आता महापालिका विलिनीकरणावरून गावकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम असून सुरू असलेल्या योजना महापालिकेकडे वर्ग होणार की पीएमआरडीएकडे राहणार याविषयी सवाल केला जात आहे.

२५ हजार लोकसंख्या असलेलं महाळुंगे हे गाव पुणे शहरालगत आहे. बालेवाडी, सूसगाव, बाणेर आणि हिंजवडी अशी विकसित गावं शेजारी असूनही आमचा विकास झाला नसल्याची खंत म्हाळुंगेकरांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

म्हाळुंगेत प्रवेश करताना लागणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झालेले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनं एकाच वेळी निघणं कठीण आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. जी झालेली आहेत ते रस्ते आता पुन्हा खराब झाले असून, गावात असे खूप रस्ते आहेत जे फक्त गावातील नागरिकांच्या कौटुंबिक वादामुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत, अशीही गावकऱ्यांची तक्रार आहे.

------------------

गावात ड्रेनेज,रस्ते आणि डिजिटल शाळा अशा वेगवेगळ्या स्वरूपांत विकासकामं सुरू असून आमची ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतीमार्फत चांगला विकास होऊ शकतो.

- मयूर भांडे, सरपंच, महाळुंगे

................

आम्ही महाळुंगेकरांनी महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी १९९७ साली विरोध दर्शविला होता. त्याचा आम्हाला आज पश्चाताप होतो. सरकारने आमची ती चूक दुरुस्त करून आमचे गाव महानगरपालिकेत विलीन करावे.

- लक्ष्मण पाडोळे, अध्यक्ष,

राजश्री शिवराय प्रतिष्ठान