शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इंग्रजी शाळांचं नेमकं काय?

By admin | Updated: July 25, 2015 04:34 IST

: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत प्रवेश द्वारातही उभे करत नाही. तसेच राज्य शासनाचा

पुणे : सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत प्रवेश द्वारातही उभे करत नाही. तसेच राज्य शासनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही, या आविर्भावात कामकाज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरी त्याची अंमलबजावणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासन कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न फारसा जाणवत नाही. मात्र, शहरी भागात वाढत चाललेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना १० किलोपर्यंत वजनाचे दप्तर शाळेत घेवून जावे लागते. शासनातर्फे जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्वयंसेवी संस्थांच्या शाळांबरोबरच काही खासगी अनुदानित शाळांना कोणत्या ना कोणत्या पध्दतीने अनुदान दिले जाते. परिणामी या शाळांना शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. अनुदान मिळत असल्यामुळे या शाळांना शासन आदेशानुसार दप्तराबाबत प्रसिध्द केल्या जाणाऱ्या नियमावलीची अंमलबजावणी करावी लागेल. परंतु, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळात ही अंमलबावणी करण्यात शासन अपयशी ठरेल, अशी सध्याची स्थिती असल्याचे शिक्षण क्षेत्रातील काही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.