शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

बारावी परीक्षेला पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्यामुळे त्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजार ९८३ एवढी आहे. पुणे विभागातून पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात १ लाख २६ हजार ६०६ मुलांचा १ लाख ४ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे.

शिक्षणतज्ज्ञांकडून परीक्षेबाबत वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत. तर विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने आणि कमी गुणांची परीक्षा घेऊन आम्हाला तणावातून दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

--------

ऑफलाइन पर्याय स्वीकारला तर प्रश्नांची संख्या कमी करून परीक्षेची वेळ कमी करावी. विज्ञान शाखेचा प्रायोगिक भाग परीक्षेतून वगळावा. केवळ थेअरीवर परीक्षा घ्यावी. परीक्षा टाळायचीच असेल तर विद्यार्थ्यांनी कृतीसंशोधन प्रकल्प सादर करावा व शिक्षकांनी त्यावर त्यांची ऑनलाइन तोंडी परीक्षा घ्यावी. दहावी व अकरावीच्या गुणांवर इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा.

- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

----------

कमी गुणांची सर्व विषयांवरील प्रश्नांची एकच परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडून इयत्ता बारावीबाबत घेतली जाणारी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नीट, जेईई यासारख्या परीक्षा इयत्ता बारावीनंतर घेतल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून घेतल्या जाणा-या निर्णयाकडे लक्ष देऊन त्याच्याशी सुसंगत निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--------

इयत्ता बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे. ती कोणत्या पद्धतीने घ्यावी याचा विचार राज्य मंडळाने करावा. परंतु, इयत्ता बारावीच्या गुणांवर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही. त्यासाठी स्वतंत्र प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून बारावीची परीक्षा घेता येईल.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

----------

परीक्षेला खूप उशीर झाला आहे. कोरोनाची अशीच परिस्थिती पुढील एक महिनाभर राहिली तर शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेसारखी एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा.

- ओम ‌नवले, विद्यार्थी, इयत्ता बारावी, स. प. महाविद्यालय

-----

शासनाकडून परीक्षांबाबत पर्यायांचा विचार केला जात आहे. ऑनलाइन परीक्षा घेतल्या तर सर्वच विषयांची परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य होईल. मात्र, ऑफलाईन परीक्षा घ्यायचे ठरले तर काही निवडक विषयांची परीक्षा घ्यावी.

- ईश्वरी पाटील, विद्यार्थी, इयत्ता बारावी, मुक्तांगण,

----

ऑनलाइन परीक्षेच्या पर्यायाचा विचार करावा. ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर काही निवडक विषयांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्यावी. मात्र सलग तीन तास विद्यार्थी मास्क लावून एका ठिकाणी बसू शकत नाही. त्यामुळे ५० गुणांची परीक्षा असावी.

- तन्वी पवार, विद्यार्थी, इयत्ता बारावी, स. प. महाविद्यालय