शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आमच्याकडेही आहेत तुल्यबळ उमेदवार

By admin | Updated: August 19, 2014 01:01 IST

अन्य पक्षातील ताकदवान उमेदवार आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना का ‘नाही’ म्हणायचे, असा प्रतिप्रश्न महायुतीतील घटक पक्षांनी विचारला आह़े

पुणो : आमच्याकडे ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आहेत, अशाच जागा प्रामुख्याने आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेनेकडे मागितल्या असून आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आह़े अन्य पक्षातील ताकदवान उमेदवार आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांना का ‘नाही’ म्हणायचे, असा प्रतिप्रश्न महायुतीतील घटक पक्षांनी विचारला आह़े 
भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घटक पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर आमच्या आमदारांची जागा देण्यासही आम्ही तयार आहोत़ घटक पक्षांनी तुल्यबळ उमेदवार दाखवावेत, असे सांगितले होत़े युतीकडून जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि त्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांना संधी द्यायची.याद्वारे पक्षाची आणि अन्य उमेदवारांसाठी आर्थिक व्यवस्था करायची, अशी घटक पक्षांची व्यूहरचना असल्याचे बोलले जात आह़े
राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आह़े आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून पक्षचिन्हही दिले आह़े त्यामुळे ही मान्यता टिकवून ठेवण्यासाठी पक्षचिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणो हे आमचे पहिले लक्ष्य आह़े पण आम्ही कधीही तिकिटाची विक्री केलेली नाही, असे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले. आमच्या पक्षात तीन माजी आमदारांनी नुकताच प्रवेश केला आह़े त्यांच्यासाठी आम्हाला जागा हव्या आहेत़ 
युतीकडे 12 जागा मागितल्या आहेत. संघर्ष करून पक्षासाठी कार्य करणारे कार्यकर्ते असून त्यांच्यासाठीच या जागा मागितल्या आहेत़ त्या जागाही भाजपा, शिवसेना हे जेथे दुस:या, तिस:या क्रमांकावर आहेत अशाच आहेत़ येत्या 22 ऑगस्टर्पयत हे घटक पक्षातील जागावाटप निश्चित झाले असेल, अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे म्हणाले, जागावाटपाबाबत युतीबरोबर दोन बैठका झाल्या आहेत़ आम्ही काही जास्त जागा मागत नाही आणि कोणाला किती जागा मिळाल्या म्हणून महायुतीत भांडणो होणार नाहीत़ 
अनेक ठिकाणी संघर्ष करून ज्यांनी आपला कार्यकत्र्याचा संच तयार केला आहे, अशा ठिकाणच्याच जागांची मागणी आम्ही केली आह़े भाजपा, शिवसेनेप्रमाणो आम्हालाही पक्ष वाढवायचा आह़े लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी अन्य पक्षांतील इच्छुकांना घेऊन उमेदवारी देऊन आपले बळ वाढविले होत़े त्याप्रमाणो कोणी आमच्याकडे येत असेल तर त्यांना आम्ही जरूर संधी देणार आहोत, असे ते म्हणाले. 
 
सर्व निवडणुका आर्थिक गणितावर अवलंबून नसतात; नाहीतर टाटा, बिर्ला हेही खासदार, आमदार झाले असत़े अंतिम बैठकीत कोणाला किती जागा मिळतील, हे स्पष्ट होईलच़ पण जागावाटपावर जास्त भर न देता सत्ताबदल घडविण्यावर आमचा भर असेल, असे मेटे यांनी सांगितल़े
 
शिवसंग्राम या सामाजिक संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रूपांतर केले जाणार असून, चार दिवसांत मुंबईत पक्षाची रीतसर घोषणा केली जाईल़ विधानसभेसाठी जागा मागताना आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. जेथे शिवसेना व भाजपाचे आमदार आहेत त्या जागांचा तसेच ज्या मतदारसंघांमध्ये उभय पक्षांकडे सक्षम उमेदवार आहेत, त्या जागांचा आम्ही आग्रह धरणार नाही़ 
- आ. विनायक  मेटे, संस्थापक अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना