शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: May 28, 2014 00:29 IST

गावातील ट्रान्सफॉर्मर मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गावचा नळपाणीपुरवठाही बंद पडला आहे. महिलांना भर उन्हाळ्यात दीड किलोमीटरवर असणार्‍या गावच्या विहिरीवरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

भोर : पान्हवळ (ता. भोर) गावातील ट्रान्सफॉर्मर मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गावचा नळपाणीपुरवठाही बंद पडला आहे. महिलांना भर उन्हाळ्यात दीड किलोमीटरवर असणार्‍या गावच्या विहिरीवरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. वारंवार ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी करुनही वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होते. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महिलांना भर उन्हातान्हात पाण्यासाठी दीड किलोमीटरवर असणार्‍या गावाच्या विहिरीवरुन डोक्यावरुन पाणी आणावे लागते. भर उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने महिलांसह गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आंबवडे खोर्‍यातील आंबवडे, नाझरे, म्हाकोशी, कर्नावड, रावडी, चिखलगाव, हिटेघर कोलै वडतुंबी, घोरपडेवाडी या गावामध्येही २१ तारखेपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे म्हाकोशी बंधार्‍यातून शेतीला व पिण्याचा पाण्याचा नळपाणीपुरवठा योजना बंद आहेत. पाणी समोर असूनही नळ विजेअभावी ते उचलता येत नाही. त्यामुळे शेतातील पीके जळून जात असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशीच अवस्था हिर्डोशी खोर्‍यातील गावामध्ये सुरु आहे. याकडे वीजवितरण कंपनीने लक्ष देण्याची खरी गरज आहे. अन्यथा कंपनीचा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.