शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

तक्रारवाडीचे पाण्याचे एटीएम महागच!

By admin | Updated: April 25, 2015 05:02 IST

तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथे नव्याने बसवण्यात आलेल्या पाण्याच्या एटीएम मशीनमुळे ग्रामस्थांचे खिसे रिकामे होत आहेत

भिगवण : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथे नव्याने बसवण्यात आलेल्या पाण्याच्या एटीएम मशीनमुळे ग्रामस्थांचे खिसे रिकामे होत आहेत. पाण्याचा लिटरचा दर २५ पैशांवरून प्रतिलिटर १० पैसे करावा, अशी मागणी केली जात आहे. इंदापूर तालुका आणि परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करणारी पहिलीच योजना तक्रारवाडी येथे कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे गावाला शुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला. ही योजना कायमस्वरूपी चालावी यासाठी त्या वेळच्या पाणीवाटप समितीने प्रत्येक कुटुंबाला महिना १०० रुपयेप्रमाणे कर आकारला होता. त्यातून शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या करातून आॅपरेटर पगार जाऊन काही पैसे शिल्लक राहत होते. यानंतर या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आले. या मशीनमधील पाणी २५ पैसे प्रतिलिटरप्रमाणे देण्यात येऊ लागले. परंतु, त्यामुळे मोठ्या कुटुंबाला महिन्याला ५०० ते १००० रुपयांचा भुर्दंड बसू लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटला जात आहे. पाण्याचा प्रतिलिटर दर कमी करावा, अशी मागणी होत आहे. इतर ठिकाणी अशा योजनेसाठी प्रतिलिटर १० पैसे दर आकारला जात आहे. त्याप्रमाणे दर आकारला जावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच ही योजना फक्त तक्रारवाडी गावासाठी आहे. त्यामुळे त्याचा लाभ गावातील ग्रामस्थांनाच मिळावा. बाहेरगावी राहणाऱ्या लोकांचा येथे त्रास होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)