शहरं
Join us  
Trending Stories
1
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
2
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
3
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
4
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
5
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
6
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
7
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
8
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
9
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
10
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
11
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
12
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
13
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
14
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
15
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
16
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
17
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
18
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
19
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
20
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?

स्वत:ची पिके नष्ट करून गावाला पाणी!

By admin | Updated: May 29, 2016 03:58 IST

शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली

कडूस : शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली येथील गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे करीत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून शिरोली गावास अव्याहतपणे स्वत:च्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी देण्याचे काम करीत आहेत.सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. खेड तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर भीमा नदीकाठावर असलेल्या शिरोली गावात सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले आहे. त्याचा परिणाम परिसरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शिरोलीत दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.शिरोली गावातील बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी, वैदवस्ती या वाड्यावस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे गावच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. परंतु, भीमा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या वाड्या-वस्त्यांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन शिरोली येथील शेतकरी गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे यांनी आपल्या अडीच एकर शेतजमिनीत असलेली दुधी भोपळा, बाजरी व मका ही पिके स्वत: उपटून नष्ट केली असून, जमीन नांगरून टाकली आहे व शेतासाठी देण्याचे विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी मोटारने उपलब्ध करून दिले आहे. बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या वाड्या-वस्त्यांवरील जवळपास एक हजार लोकवस्तीला या विहिरीवरून दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे.शिरोली येथील वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या बहुतांश मागासवर्गींय नागरिकांच्या वस्त्या आहे. येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी गोविंद राक्षे व संजय राक्षे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून जवळपास दीड ते दोन कि.मी. अंतरावरून स्वखर्चाने पाइपलाइन करून घराजवळ पाण्याची टाकी बांधून मोटारीने विहिरीतील पाणी या पाण्याच्या टाकीत टाकून नळकोंडाळी काढली आहेत. या नळकोंडाळ्यावर गेल्या तीस वर्षांपासून बाराही महिने या वस्त्यांवरील नागरिक पिण्यासाठी पाणी नेत आहेत.गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्यासाठी स्वत:च्या शेतातील पिके नष्ट करून मानवता धर्म पाळत नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गोविंद राक्षे व संजय राक्षे या शेतकऱ्यांचे संपूर्ण शिरोली गावात कौतुक होत आहे. (वार्ताहर)देवाच्या कृपेने उन्हाळ्यातही आमच्या शेतातील विहिरीस मोठ्या प्रमाणावर पाणी असते. शेतातील पिकांसाठी पाणी देण्याऐवजी लोकांना पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. म्हणून शेतातील पीक नष्ट करून प्रथम लोकांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.- गोविंद राक्षे, शेतकरीशेतातील पिकांना पाणी देण्यापेक्षा मानवता धर्म महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकांपेक्षा नागरिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथील नागरिकांना या विहिरीचे पाणी देत असून, त्यामुळे नागरिकांच्या आशीर्वादामुळे व देवाच्या कृपेने विहिरीस भरपूर पाणी उपलब्ध आहे.- संजय राक्षे, शेतकरी