शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

स्वत:ची पिके नष्ट करून गावाला पाणी!

By admin | Updated: May 29, 2016 03:58 IST

शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली

कडूस : शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली येथील गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे करीत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून शिरोली गावास अव्याहतपणे स्वत:च्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी देण्याचे काम करीत आहेत.सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. खेड तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर भीमा नदीकाठावर असलेल्या शिरोली गावात सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले आहे. त्याचा परिणाम परिसरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शिरोलीत दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.शिरोली गावातील बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी, वैदवस्ती या वाड्यावस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे गावच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. परंतु, भीमा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या वाड्या-वस्त्यांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन शिरोली येथील शेतकरी गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे यांनी आपल्या अडीच एकर शेतजमिनीत असलेली दुधी भोपळा, बाजरी व मका ही पिके स्वत: उपटून नष्ट केली असून, जमीन नांगरून टाकली आहे व शेतासाठी देण्याचे विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी मोटारने उपलब्ध करून दिले आहे. बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या वाड्या-वस्त्यांवरील जवळपास एक हजार लोकवस्तीला या विहिरीवरून दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे.शिरोली येथील वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या बहुतांश मागासवर्गींय नागरिकांच्या वस्त्या आहे. येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी गोविंद राक्षे व संजय राक्षे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून जवळपास दीड ते दोन कि.मी. अंतरावरून स्वखर्चाने पाइपलाइन करून घराजवळ पाण्याची टाकी बांधून मोटारीने विहिरीतील पाणी या पाण्याच्या टाकीत टाकून नळकोंडाळी काढली आहेत. या नळकोंडाळ्यावर गेल्या तीस वर्षांपासून बाराही महिने या वस्त्यांवरील नागरिक पिण्यासाठी पाणी नेत आहेत.गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्यासाठी स्वत:च्या शेतातील पिके नष्ट करून मानवता धर्म पाळत नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गोविंद राक्षे व संजय राक्षे या शेतकऱ्यांचे संपूर्ण शिरोली गावात कौतुक होत आहे. (वार्ताहर)देवाच्या कृपेने उन्हाळ्यातही आमच्या शेतातील विहिरीस मोठ्या प्रमाणावर पाणी असते. शेतातील पिकांसाठी पाणी देण्याऐवजी लोकांना पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. म्हणून शेतातील पीक नष्ट करून प्रथम लोकांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.- गोविंद राक्षे, शेतकरीशेतातील पिकांना पाणी देण्यापेक्षा मानवता धर्म महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकांपेक्षा नागरिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथील नागरिकांना या विहिरीचे पाणी देत असून, त्यामुळे नागरिकांच्या आशीर्वादामुळे व देवाच्या कृपेने विहिरीस भरपूर पाणी उपलब्ध आहे.- संजय राक्षे, शेतकरी